Sunday, March 15, 2026

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या मराठी सणासोबतच गुजराती चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते. या नऊ दिवशी देवीच्या नऊ रूपांची पूजा करून उपवास केले जातात, जाणून घ्या त्याचे योग्य पूजा आणि विधी

चैत्र नवरात्रीमध्ये नऊ दिवस आदिशक्ती दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, ज्याची सुरुवात प्रतिपदेला घटस्थापनेने (कलश स्थापना) होते। सकाळी लवकर स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून, देवीची मूर्ती/फोटो स्थापन करावी, अखंड दिवा लावावा, कलश पूजा करावी, दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा आणि दररोज देवीला फुले, फळे, नैवेद्य अर्पण करून आरती करावी

चैत्र नवरात्री पूजा विधी (स्टेप-बाय-स्टेप):

घटस्थापना (पहिला दिवस): मातीचा माठ (घट) घेऊन त्यात सात धान्ये (गहू किंवा बार्ली) पेरावीत आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा, ज्यात नाणे, सुपारी आणि आंब्याची पाने असावीत

देवीची पूजा: कलशाच्या वर नारळ ठेवावा. देवीला लाल फुले, कुंकू, हळद, आणि श्रृंगाराचे साहित्य (बांगड्या, टिकली इ.) अर्पण करावे

अखंड ज्योत: नऊ दिवस अखंड दिवा लावून देवीची उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते

दररोजची पूजा: सकाळी व संध्याकाळी दुर्गा सप्तशती, देवी कवच किंवा 'ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे' या मंत्राचा जप करावा

नैवेद्य: दररोज देवीला नैवेद्य दाखवावा (उदा. साखर, फळे, मिठाई)

कन्या पूजन: अष्टमी किंवा नवमीला लहान मुलींना (कुमारिका) घरी बोलावून, त्यांच्या पाया पडून त्यांना जेवण (पुरी, हलवा) आणि भेटवस्तू द्याव्यात

ओटी भरणे: नवरात्रीच्या कोणत्याही शुभ दिवशी किंवा नवमीला देवीची ओटी भरावी

समापन: नवमीच्या दिवशी किंवा दशमीला घट विसर्जन करावे आणि पेरलेली धान्ये (ज्वारी/गहू) नदीत किंवा झाडाखाली विसर्जित करावीत

महत्त्वाच्या गोष्टी:

नऊ दिवस पूर्ण सात्विकता पाळावी, कांदा-लसूण टाळावा पूजा करताना लाल रंगाचे कपडे वापरणे शुभ मानले जाते. दररोज अखंड दिव्यामध्ये तेल किंवा तूप तपासावे

ज्योतिषशास्त्रानुसार, चैत्र नवरात्री सुरू होण्यापूर्वी काही शुभ वस्तू घरी आणणे अत्यंत लाभदायक मानले जाते. या वस्तू घरी आणल्याने वास्तू दोष दूर होतात आणि सकारात्मकता टिकून राहते. चैत्र नवरात्रीपूर्वी कोणत्या वस्तू घरी आणाव्यात ते जाणून घेऊया.

कलश : नवरात्रीत घटस्थापना हि विशेष असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. या विधीला तांब किंवा पितळेचे कलश शुभतेचे प्रतीक मानले जातात.

मोरपंख : नवरात्री सुरु होण्यापूर्वी मोरपंख घरच्या मंदिरात किंवा मुख्य दाराजवळ लावून ठेवल्याने वस्तू दोष दूर होतो, आणि घरात सकारत्मक ऊर्जा निर्माण होते.

सोने किंवा चांदीचे नाणे : सोने किंवा चांदीचे नाणे खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये हे नाणे पूजास्थळी ठेवा आणि नंतर तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवल्याने आर्थिक सुबत्ता आणि संपन्नता टिकून राहते.

सोळा शृंगार साहित्य : चैत्र नवरात्रीपूर्वी सोळा शृंगाराच्या वस्तू खरेदी करून ठेवाव्यात. नवरात्रीमध्ये देवी दुर्गाला सोळा शृंगाराचे साहित्य अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात मधुरता येते आणि पती-पत्नीमधील नाते पूर्वीपेक्षा अधिक चांगले व्हायला त्याने मदत होते.

कमळाचे फूल :  नवरात्रीच्या एक दिवस आधी कमळाचे फूल खरेदी करून ठेवा. त्यानंतर ते देवी दुर्गाच्या चरणी अर्पण करा. देवी दुर्गेला कमळाचे फूल अर्पण केल्याने घरात सुख-शांती आणि समृद्धी लाभते. यामुळे घराचा साठा धनधान्याने भरलेला राहतो.

Comments
Add Comment