Ritu Tawde : मिठी नदीतील गॅस साठा म्हणजे 'भ्रष्टाचाराचा कचरा'; रितू तावडे यांचा 'पेंग्विन सेने'वर घणाघाती प्रहार!

मुंबई : भाजप नेत्या आणि महापौर रितू तावडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक आक्रमक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर (UBT) जोरदार हल्ला चढवला आहे. "मिठी नदीतून निघणारा गॅस ही नैसर्गिक संपत्ती नसून, गेली २५ वर्षे मुंबईवर सत्ता गाजवणाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा साचलेला कचरा आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.



२५ वर्षांच्या सत्तेचा हिशोब अन् 'ब्रिमस्टोवॅड'चा उल्लेख



रितू तावडे यांनी आपल्या पोस्टमध्ये मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे. मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी आणि स्वच्छतेसाठी 'ब्रिमस्टोवॅड' (Brimstowad) प्रकल्पांतर्गत हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, इतका मोठा निधी खर्च होऊनही प्रत्येक पावसाळ्यात मुंबई का बुडते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "हा पैसा मुंबईकरांच्या हितासाठी वापरण्याऐवजी मातोश्रीच्या लाडक्या कंत्राटदारांच्या तिजोरीत गेला आहे," असा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.


देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रंदिवस प्रयत्न करत असताना आणि 'उज्ज्वला' योजनेद्वारे घराघरात गॅस पोहोचवत असताना, मुंबईतील नेत्यांनी मात्र येथील जलस्त्रोतांना 'गॅस चेंबर' बनवून ठेवले आहे, अशी टीका तावडे यांनी केली. मिठी नदीच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे आजार होत असून, स्वतःला 'पर्यावरण प्रेमी' म्हणवणारे नेते २५ वर्षांत एक नदी स्वच्छ करू शकले नाहीत, हेच त्यांच्या सत्तेचे सर्वात मोठे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले.



'मिठी घोटाळ्याची' चौकशी होणार


रितू तावडे यांनी मुंबईकरांना आवाहन करताना म्हटले आहे की, आता नाक बंद करून जगण्याचे दिवस संपले असून भ्रष्टाचाराला गाडण्याची वेळ आली आहे. "आमची मुंबईत सत्ता आल्यावर आम्ही या 'मिठी घोटाळ्याची' सखोल चौकशी करू. हे भ्रष्टाचाराचे स्मारक आम्ही नष्ट करू," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला या दुर्गंधीतून आणि भ्रष्टाचारातून मुक्त करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारची नियमावली

अत्यावश्यक सेवांना प्राधान्य; साठा मुबलक, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुंबई : इराण आणि इस्राईल दरम्यान

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

मुंबई : मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय

१ एप्रिलपासून मर्सिडीज-बेंझच्या कार किमतीत २ टक्क्यांची होणार वाढ

मुंबई : जर्मनीची प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतीय बाजारातील ग्राहकांसाठी एक

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात