सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाईचा अहवाल सादर करा; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून शुक्रवारी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार संताप व्यक्त केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. "सभागृहाचा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही," अशा कडक शब्दांत समज देत, संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली याचा 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' (एटीआर) येत्या सोमवारी सकाळी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


शुक्रवारी सभागृहाचे कामकाज सुरू असताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दालनात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. यावरून सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवले. सभागृहातील गोंधळ आणि सदस्यांच्या भावना लक्षात घेता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रशासनाने गांभीर्य राखणे बंधनकारक आहे. "संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याचा सविस्तर अहवाल सोमवारी (१६ मार्च) कार्यालयीन कामकाज सुरू होताच माझ्या दालनात सादर करावा," असे आदेश त्यांनी सरकारला दिले.


 

 

 
Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक