स्थायी समितीच्या सभांमधून प्लास्टिक पाण्याचा बॉटल्स हद्पार

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आता कारभारात अमुलाग्र बदल केला जात असून सभा बैठकीमध्ये प्लास्टिक बॉटल्समधून पाणी देण्याऐवजी काचेच्या बॉटल्समधून पाणी देण्याची सूचनाच महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांकरता पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स पुरवल्या जातात. प्रत्येक सदस्यांच्या समोर टेबलवर मिनरल वॉटरच्या प्लास्टिक बॉटल्स ठेवल्या जातात. मात्र, याला सभागृहनेते गणेश खणकर यांनी हरकत घेत यापुढे प्रत्येक सभांमध्ये सदस्यांना पुरवले जाणारे पाण्याचा बॉटल्स त्वरीत बंद करण्यात याव्या. या प्लास्टिक बॉटल्समधून पाणी न पुरवता महापालिका नियोजन विभागाच्या माध्यमातून ज्या काचेच्या बॉटल्स उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या बॉटल्समधून सदस्यांना पाणी दिले जावे अशी सूचना खणकर यांनी केली. येत्या पुढील सभांमध्ये काचेच्या बॉटल्स पाणी सदस्यांना दिले जावे अशी सूचना खणकर यांनी केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी याची दखल प्रशासनाने घेऊन याची त्वरीत कार्यवाही केली जावी असे आदेश दिले. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकांमधून प्लास्टिक पाण्याचा बॉटल्स आता बाद झालेल्या दिसतील.
Comments
Add Comment

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी