महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी पळण्याची शक्यता आहे. पोषक आहारअंतर्गत खिचडीचा पुरवठा करणाऱ्या संस्थांना गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असून या संस्थांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी शासनासोबत महापालिकेचा पाठपुरावा सुरु झाला आहे. त्यामुळे सध्या जरी कुठल्याही शाळांमध्ये ही समस्या निर्माण झालेली नसली तर भविष्यात नव्याने सिलिंडर उपलब्ध होईपर्यंत, संस्थांना अपवादात्मक परिस्थितीत फळे वाटप करण्याचा सूचना केली जाण्याची शक्यता आहे. संस्थांना तशाप्रकारच्या सूचना दिल्या जातील असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


मुंबई महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक तसेच खासगी प्राथमिक शाळांमधील मुलांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना राबवण्यात येत असून यामाध्यमातून मुलांना मधल्या सुट्टीमध्ये खिचडी तसेच इतर खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातात. मुंबई महापालिकेच्या खासगी प्राथमिक आणि माध्यमिक तसेच खासगी अनुदानित शाळांमधील सुमारे पाच लाखांहून अधिक मुलांना या पोषक आहाराचा लाभ दिला जातो.


महापालिका शाळांमध्ये गरीब घरातील मुले शिकत असल्यामुळे त्यांना मधल्या सुटीमध्ये मध्यान्ह भोजन दिले जाते. या मध्यान्ह भोजन अंतर्गत पोषक आहाराचा पुरवठा करण्यासाठी विविध संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार या संस्थांच्या माध्यमातून याचे वाटप केले जात असले तरी सध्या देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मुंबईतही याची झळ बसण्याची शक्यता आहे. परिणामी महापालिका शाळा आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या संस्थांना गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याची चर्चा ऐकायला येत आहे.तसेच अनेक ठिकाणी संस्थांनी गॅस सिलिंडर अभावी खिचडी वाटप करणे बंद केले असल्याचीही चर्चा आहे.


मात्र, मुंबई महापालिका शाळांमध्ये सध्या तरी अशाप्रकारे मध्यान्ह भोजनचा पुरवठा बंद करणे अशाप्रकारची घटना घडलेली नाही.तसेच कोणत्यही संस्थेने पुरवठा सिलिंडर अभावी करता येणार नाही असेही शिक्षण विभागाला कळवलेलेे नाही. त्यामुळे सध्या तरी महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहार मिळणे बंद झालेला नाही. त्यामुळे जर हा आहार बंद करण्याबाबत संस्थांकडून तशी तक्रारी आल्यास शासनाला कळवले जाईल आणि शासनाच्या माध्यमातून सिलिंडर उपलब्ध करून दिला जाईल. पण सिलिंडरमुळे पोषक आहार मिळणे बंद झालेला आहे,असे कुठल्याही महापालिका शाळांमध्ये घडलेले नसून जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर सिलिंडरची सुविधा उपलब्ध होईपर्यंत फळ वाटप करण्यात येईल,तशा सूचना संस्थांना केल्या जातील असे महापलिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी महापालिका शाळांमध्ये पोषक आहार सिलिंडर उपलब्ध न झाल्यामुळे मिळू न शकण्याची स्थिती असल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार मी याबाबत अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना याची कल्पना देवून पोषक आहार पुरवणाऱ्या संस्थांना सिलिंडर उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने याबाबत आपण आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना केल्या. त्यानुसार ढाकणे यांनी रेशनिंग कंट्रोलर यांच्याशी चर्चा करून संबंधित संस्थांना सिलिंडर उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यानुसार या संस्थांना सिलिंडर उपलब्ध होईलच. पण तशीच जर काही परिस्थिती निर्माण झाली तर मुले उपाशी राहू नये यासाठी फळे वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. पण हा निर्णय अपवादात्मक परिस्थितीमध्ये घेण्यात येईल अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राज्यातील चेक पोस्ट बंद करणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आश्वासन

मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल

महाराष्ट्रात गॅस, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही 

 इराण-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष समित्यांची स्थापना; रिफायनरींकडून उत्पादन वाढवले मुंबई : इराण

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित