Jahnavi Killekar : ‘ज्या ताटात जेवलात, त्यातच छिद्र?’; रुचिता जामदारवर जान्हवी किल्लेकरची टीका, बिग बॉस व रितेश देशमुखांविरोधातील वक्तव्यांवर संताप

मुंबई : कोल्हापूरची रुचिता जामदार नुकतीच ‘बिग बॉस मराठी ६’ मधून बाहेर पडली. घराबाहेर आल्यानंतर तिने अप्रत्यक्षपणे या शोवर आणि सूत्रसंचालक रितेश देशमुख यांच्यावर टीका केली. माझ्यासोबत भेदभाव झाला आणि मला माझी बाजू मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली नाही, अशी नाराजी तिने व्यक्त केली.


रुचिताच्या या वक्तव्यांवर आता ‘बिग बॉस मराठी ५’ ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत जान्हवीने बिग बॉस आणि रितेश देशमुख यांच्याविरोधात बोलणाऱ्या स्पर्धकांवर निशाणा साधला. “ज्या ताटात जेवलात, त्यातच छिद्र का करताय?” अशा शब्दांत तिने रुचिताला सुनावले.



काय म्हणाली जान्हवी ?


जान्हवीने व्हिडिओमध्ये सांगितले की, महाराष्ट्रात अनेक कंटेंट क्रिएटर्स, अभिनेते आणि इन्फ्लुएन्सर्स बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात. “बिग बॉस हा खूप मोठा शो आहे आणि त्या घरात जाण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात. अशा मोठ्या मंचावर संधी मिळाल्यानंतर त्या शोबद्दल वाईट बोलणं योग्य नाही,” असे ती म्हणाली.


पुढे थेट रुचिताचे नाव घेत जान्हवी म्हणाली, “बिग बॉस पक्षपाती आहेत किंवा रितेश देशमुख पक्षपाती आहेत, असं बोलणं चुकीचं आहे. त्या शोने तुम्हाला संधी दिली, ओळख दिली. त्यामुळे त्या मंचाचा आदर ठेवायला हवा.”





तिने स्वतःचा अनुभव सांगताना म्हटले की, बिग बॉसच्या घरात असताना चुका होतात, गेम बदलतो, रागही येतो. “मीसुद्धा अनेक चुका केल्या. वीकेंडच्या वाराला मला बोलूही दिलं नाही, कधी ओरडाही मिळाला. तरी मी कधीही शोला किंवा रितेश सरांना दोष दिला नाही,” असे ती म्हणाली.


शेवटी जान्हवीने स्पष्ट इशारा देत म्हटले की, “माझ्यासाठी बिग बॉस हा देवासारखा शो आहे. या शोमुळे मला महाराष्ट्रात ओळख मिळाली. त्यामुळे कोणालाही या शोविरोधात किंवा रितेश देशमुखांविरोधात बोलणं मी सहन करणार नाही.”

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi 6 : आज विषय गंभीर! रितेश भाऊंचा 'धक्का' कोणाला बसणार? प्रोमो आला समोर!

मुंबई : कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस मराठी सीझन ६' ( Bigg

Mahrashtrachi Hasayjatra Nirmiti Sawant : सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये निर्मिती सावंत यांचा खास धमाका

मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मनोरंजन देत आली आहे. कुटुंबासह पाहता

Savni Ravindra : गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु; 'सावनी रेकॉर्डझ्' ची घोषणा

मुंबई : मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि