निधी संपवण्यासाठी महापालिका शाळांच्या मुलांची सहल; महापालिकेच्या स्थायी समितीने दाखवला प्रशासनाला इंगा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने अत्यंत घाईघाईत स्थायी समिती मंजुरीसाठी सादर केला. परंतु हा प्रस्ताव मुलांच्या सहलीपेक्षा यासाठी मंजूर निधी ३१ मार्च पूर्वी वापरण्यासाठी आणि पर्यायाने संस्थेची तिजोरी भरण्यासाठी असल्याचे स्पष्ट आरोपच करत हा प्रस्ताव राखून ठेवत प्रशासनाला आणखी एक इंगा दाखवला


स्थायी समितीच्या पटलावर शेवटच्या क्षणाला महापलिका शाळांमधील मुलांच्या सहलीचा प्रस्ताव मांडण्यात आल्यामुळे सभागृहनेते गणेश खणकर यांनी याला हरकत घेत हा प्रस्ताव मंजूर करण्याची घाई न करता राखून ठेवण्याची सूचना केली. यावर शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी पाठिंबा देता इयत्ता ४थी आणि इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी काढण्यात येणाऱ्या सहलीसाठी एकमेव संस्थेची निवड कशी केली असा सवाल उपस्थित केला. तसेच तब्बल ६६०० मुलांना घेवून जाणारी ही संस्था सुपरमॅन आहे का असा सवाल करत या मुलांची काळजी कोण घेणार अशी चिंता व्यक्त केली. सध्या परिक्षांचे दिवस आहेत, अशात या मुलांना कोणते पालक पाठवणार असाही सवाल केला. तर याला यामिनी जाधव यांनी पाठिंबा देत केवळ प्रत्येक मुलांमागे ७३० रुपये देण्यात येणार आहे मग त्यांना खायला काय देणार याचाही कुठेही उल्लेख नसल्याचे सांगितले. तर अश्रफ आझमी यांनी आचारसंहितेमुळे सहल आयोजित करता आली नसल्याचे सांगत शिक्षण विभागाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. तर एमआयएमचे सलीम कुरेशी यांनी ६७०० हजार मुलांपैंकी १० ते २० टक्के मुले न आल्यास त्याचे पैसे संस्थेकडून परत घेतले जाणार का असा सवाल केला. तर डॉ सईदा खान यांनी सध्या दहावीच्या परिक्षा सुरु असून शिक्षक या मुलांच्या परीक्षा सांभाळून या सहलीचे आयोजन कसे करणार असा सवाल केला. त्यामुळे अशाप्रकारची मुलांची सहल असेल तर आधी जावून पाहून मगच त्यानुसार मुलांच्या सहलीचे आयोजन करावे अशी सूचना केली. तर मनसेच यशवंत किल्लेदार यांनी ही सहल ०९ ते २७ मार्च दरम्यान काढली जाणार असून त्यातील शनिवार आणि रविवार वगळता उर्वरीत दहा दिवस आहेत. यात प्रत्येक दिवशी २ हजार विद्यार्थी गृहीत धरले तर २० हजार मुले होता, मग उर्वरीत मुलांचे काय करणार असा सवाल त्यांनी केला. यावर अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सर्व सदस्यांनी उपस्थित केलेला मुद्दयांची दखल घेवून माहिती सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विशेष म्हणजे या प्रस्तावामध्ये सहलीसाठी नियुक्त श्रीयांश एंटरप्रायझेस या संस्थेला ३१ मार्च २०२६ पूर्वी संबंधित लेखा विभागार्फत अधिदानाची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे नमुद केले.त्यामुळे तरतूद निधी संपवण्यासाठी आणि ठराविक एकमेव संस्थेला काम देण्याचा प्रशासनाचा डाव उघडकीस आल्यामुळे सभागृहनेेते आणि शिक्षण समिती अध्यक्षा यांनी याला आक्षेप घेत प्रशासनाचे मनसुबे उधळून लावले.



कुठल्या ठिकाणी किती मुले जाणार सहलीला


 

भायखळा राणीबाग : इयत्ता ४थी, एकूण मुले ३६,७२०


सहलीसाठी येणारा खर्च : २ कोटी ३१ लाख ३३ हजार ६००


संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरीवली : इयत्ता ७वी, २९,०६४ व माध्यमिक ८४६


सहलीसाठी येणारा खर्च : २ कोटी ०९ लाख ३७ हजार रुपये

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य