गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील बाधितांना या महिना अखेरपर्यंत कांजुरमार्गला मिळणार घरे

मुंबई: बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या रस्ते विकास प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या निवासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कांजूर (पश्चिम) येथे ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ अंतर्गत सुमारे १० हजार ५० चौरस मीटर क्षेत्रफळावरील ७ इमारतींमध्ये ९०६ सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. पैकी २ इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून २५२ प्रकल्प बाधितांचे मार्च २०२६ अखेरपर्यंत पुनर्वसन करावे. उर्वरित सदनिकांचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करावे. जेणेकरून, त्या लवकरात लवकर प्रकल्पबाधितांना सुपूर्द करता येतील. तसेच, प्रकल्पाच्या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ अंतर्गत कांजूर (पश्चिम) येथे गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येत असलेल्या सदनिकांची अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी ६ मार्च २०२६ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. नगर अभियंता रामचंद्र कदम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्प हा एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे बाधित नागरिकांच्या निवासासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कांजूर (पश्चिम) येथे सुमारे १०,०५० चौरस मीटर क्षेत्रफळावर ७ इमारती बांधण्यात येत आहेत. यामध्ये, तळमजला + २३ मजल्यांच्या इमारतींचा समावेश आहे. या ५ इमारतींमध्ये प्रकल्पबाधितांसाठी एकूण ९०६ सदनिका बांधण्यात येत आहेत. प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ ३०० चौरस फूट असून त्यामध्ये बैठक, शयनकक्ष (संलग्नित स्वच्छतागृह), स्वयंपाकघर यांचा समावेश आहे. तसेच, प्रकल्पाच्या परिसरात बाजार, सामुदायिक सभागृह, वाचनालय, आरोग्य केंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर, बांधकामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बांगर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये सदनिकांच्या आतमधील संरचना; पाणी, स्वच्छतागृह, वीज, उद्वाहन (लिफ्ट), पायऱ्या, अग्निसुरक्षाविषयक उपाययोजना आदींची गुणवत्ता तसेच त्यासंबंधित महत्त्वपूर्ण बाबींची त्यांनी अत्यंत बारकाईने पाहणी केली आणि एकंदर प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.

सदनिकांचे बांधकाम योग्यप्रकारे आणि दर्जेदारपणे सुरू आहे. तथापि, याठिकाणी वास्तव्यास येणाऱ्या प्रकल्पबाधित नागरिकांसाठी अन्य आवश्यक सोयीसुविधांचीही विहित वेळेत पूर्तता करावी. तसेच, सदनिकांचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करुन या सदनिका त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करुन दिल्या जातील, यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही बांगर यांनी यावेळी दिल्या.


बांगर म्हणाले की, गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प टप्पा ३ अंतर्गत जून २०२६ पासून बोगदा खनन संयंत्राद्वारे भूमिगत बोगद्यांच्या खोदकामास सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी, अमर नगर येथे लॉन्चिंग शाफ्टचे काम सुरु होणे अपेक्षित आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. अमर नगर येथील प्रकल्प बाधितांचे कांजूर (पश्चिम) येथे पुनर्वसन केले जाणार आहे. पात्र कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७ इमारतींमध्ये सुमारे ३०० चौरस फुटांच्या सदनिकांची उभारणी करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्त नागरिकांना सुरक्षित व सन्मानजनक निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा पुनर्वसन उपक्रम राबविण्यात येत आहे. या गृहनिर्माण संकुल परिसरात अंतर्गत रस्ते, मोकळी जागा आणि आवश्यक नागरी सुविधा विकसित करण्यात येत आहे. २ इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून मार्च २०२६ अखेरपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २५ सदनिका उपलब्ध होतील. तर, उर्वरित ५ इमारतींना एप्रिल २०२६ अखेरपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणे अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचे बांगर यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Sumantrao Pendharkar : 'विको'ला जागतिक ओळख देणारे उद्योगरत्न सुमंतराव पेंढरकर यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि

Maharashtra Vidhan Bhavan : विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबई : महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर

Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार 'जेन-झीं'शी संवाद

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे