Monday, March 9, 2026

Miss India Earth 2019 : आतिफशी लग्न, मग धर्म परिवर्तन, आणि पुन्हा हिंदू धर्म.... या मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

Miss India Earth 2019 : आतिफशी लग्न, मग धर्म परिवर्तन, आणि पुन्हा हिंदू धर्म.... या मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली सुर्वे ही मराठी आणि मूळची पुण्याची परंतु तिने आतिफ या इसमाची २०१९ मध्ये घरच्यांचा विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. आतिफ याच्याशी प्रेमविवाहानंतर तिच्यावर जबरदस्तीने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला आणि तिला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, असा आरोप तिने केला.

सायलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन मीरा-भाईंदरमधील व्यावसायिक आतिफ तासे याच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर काही काळाने परिस्थिती बदलली आणि तिला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला.

चार मुलांच्या भविष्यासाठी तिने बराच काळ हे सहन केले. मात्र परिस्थिती गंभीर होत गेल्याने तिने या सर्वाबद्दल उघडपणे बोलण्याचा निर्णय घेतला.

यानंतर हिंदू संघटनांच्या मदतीने तिने वैदिक पद्धतीने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. निकाहनंतर तिचे नाव ‘अतेजा तासे’ ठेवले गेले होते, पण घरवापसीनंतर तिने पुन्हा आपले नाव बदलून आद्या सुर्वे असे ठेवले आहे.

सायलीने सांगितले की, आतिफ तासेशी लग्न करण्याचा निर्णय हा तिच्या आयुष्यातील मोठा चुकीचा निर्णय होता आणि आता पुन्हा आपल्या मूळ धर्मात परतल्याने तिला समाधान मिळाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा