जेम्स नीशमच्या ‘त्या’ षटकामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक

मुंबई (प्रतिनिधी) : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वादार फलंदाजी पाहायला मिळाली. भारतीय संघाच्या सलामी जोडीने षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत तडाखेबंद खेळ केला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने पहिल्या विकेटसाठी अवघ्या ७.१ षटकात ९८ धावांची भागिदारी केली. त्यात, अभिषेकने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. २१ चेंडूत ५२ धावांची तुफानी खेळी करत अभिषेक पॅव्हेलिनयमध्ये परतला. त्यानंतर, संजूने धुव्वादार फलंदाजी करत आपलेही अर्धशतक पूर्ण केले. संजूला इशानेही तशीच साथ दिली. त्यामुळे, भारताने १५ व्या षटकात २०० धावांचा टप्पा गाठला होता. मात्र, १६ व्या षटकात भारताच्या धावगतीला ब्रेक बसला.


जेम्स नीशमने १६ व्या षटकात सामन्याच चित्र पलटवून टाकले, भारत २५०+ धावांच्या दिशेने वेगाने धावत असताना या एकाच षटकात तीन दिग्गज फलंदाजांच्या विकेट पडल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारताची धावसंख्या घसरली अन् १६ आणि १७ या दोन षटकांत भारतीय संघाला सर्वात कमी धावा बनवता आल्या. १६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नीशमने संजू सॅमसनला आऊट केले, सॅमसनने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या जोरावर ८९ धावांची तुफानी खेळी केली. मिडऑफच्या वरुन संजूने लगावलेल्या उत्तुंग फटक्याचा बाँड्री लाईनवर झेल टिपला. त्यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर नीशमने ईशान किशनला चॅपमनकडे झेल देण्यास भाग पाडले. ईशानने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ धावा केल्या. तर, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नीशमने सूर्यकुमार यादवला रचिनच्या हाती झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. कर्णधार सूर्यकुमार यादव खातेही उघडू शकले नाही, कर्णधार शून्यावर बाद झाला. त्यामुळे, १५ षटकात २०३ धावा केलेल्या भारतीय संघाची १६ षटकांनंतर ४ बाद २०४ अशी अवस्था झाली होती.


सचिनकडून जेम्सचे कौतुक


भारतीय संघाचा माजी फलंदाज मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही ट्विट करत भारतीय फलंदाजांच्या तुफानी खेळीचे कौतुक केले. तर, जेम्स नीशानच्या गोलंदाजीचे कौतुक करायलाही सचिनने मागे पाहिले नाहीत. विशेष म्हणजे, जेम्सच्या षटकात घेण्यात आलेल्या तिन्ही फलंदाजांचे झेल अफलातून होते. त्यामध्ये, संजू सॅमसन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या तिघांचेही झेल सीमारेषेवरच टिपण्यात आले आहेत. सचिनने ट्विट करत या तिन्ही झेलचे कौतुक केले आहे. दरम्यान, भारतीय फलंदाजांच्या धुव्वादार फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकात २५५ धावांचा डोंगर उभारला.

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या