जेम्स नीशमच्या ‘त्या’ षटकामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक

मुंबई (प्रतिनिधी) : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वादार फलंदाजी पाहायला मिळाली. भारतीय संघाच्या सलामी जोडीने षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत तडाखेबंद खेळ केला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने पहिल्या विकेटसाठी अवघ्या ७.१ षटकात ९८ धावांची भागिदारी केली. त्यात, अभिषेकने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. २१ चेंडूत ५२ धावांची तुफानी खेळी करत अभिषेक पॅव्हेलिनयमध्ये परतला. त्यानंतर, संजूने धुव्वादार फलंदाजी करत आपलेही अर्धशतक पूर्ण केले. संजूला इशानेही तशीच साथ दिली. त्यामुळे, भारताने १५ व्या षटकात २०० धावांचा टप्पा गाठला होता. मात्र, १६ व्या षटकात भारताच्या धावगतीला ब्रेक बसला.


जेम्स नीशमने १६ व्या षटकात सामन्याच चित्र पलटवून टाकले, भारत २५०+ धावांच्या दिशेने वेगाने धावत असताना या एकाच षटकात तीन दिग्गज फलंदाजांच्या विकेट पडल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारताची धावसंख्या घसरली अन् १६ आणि १७ या दोन षटकांत भारतीय संघाला सर्वात कमी धावा बनवता आल्या. १६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नीशमने संजू सॅमसनला आऊट केले, सॅमसनने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या जोरावर ८९ धावांची तुफानी खेळी केली. मिडऑफच्या वरुन संजूने लगावलेल्या उत्तुंग फटक्याचा बाँड्री लाईनवर झेल टिपला. त्यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर नीशमने ईशान किशनला चॅपमनकडे झेल देण्यास भाग पाडले. ईशानने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ धावा केल्या. तर, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नीशमने सूर्यकुमार यादवला रचिनच्या हाती झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. कर्णधार सूर्यकुमार यादव खातेही उघडू शकले नाही, कर्णधार शून्यावर बाद झाला. त्यामुळे, १५ षटकात २०३ धावा केलेल्या भारतीय संघाची १६ षटकांनंतर ४ बाद २०४ अशी अवस्था झाली होती.


सचिनकडून जेम्सचे कौतुक


भारतीय संघाचा माजी फलंदाज मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही ट्विट करत भारतीय फलंदाजांच्या तुफानी खेळीचे कौतुक केले. तर, जेम्स नीशानच्या गोलंदाजीचे कौतुक करायलाही सचिनने मागे पाहिले नाहीत. विशेष म्हणजे, जेम्सच्या षटकात घेण्यात आलेल्या तिन्ही फलंदाजांचे झेल अफलातून होते. त्यामध्ये, संजू सॅमसन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या तिघांचेही झेल सीमारेषेवरच टिपण्यात आले आहेत. सचिनने ट्विट करत या तिन्ही झेलचे कौतुक केले आहे. दरम्यान, भारतीय फलंदाजांच्या धुव्वादार फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकात २५५ धावांचा डोंगर उभारला.

Comments
Add Comment

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय

Ishan Kishan : सामन्याच्या आधी इशान किशनवर दुःखाचा डोंगर; इशानने विजयाचं श्रेय दिलं या व्यक्तीला

मुंबई : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत

संजू सॅमसन बनला क्रिकेट विश्वाचा नवा ‘फायनल बॉस’!

कोहली-सॅम्युअल्स-विल्यमसनचे रेकॉर्ड्स धुळीस अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारतीय फलंदाज संजू सॅमसनने टी-२० विश्वचषक

अभिषेक शर्माने नॉकआउटमध्ये विक्रमी अर्धशतकासह रचला इतिहास

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील नॉकआउटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक

Sanju Samson: संजूच्या यशामागे सचिन तेंडुलकरचा हात?; भावूक पोस्ट चर्चेत

मुंबई: भारताने टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर ९६ रनने विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरलं आहे. या