Attack on Saudi Arabia : सौदी अरेबियावरील हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही; अफवांवर विश्वास ठेऊ नका

- भारतीय दूतावासाने दिली माहिती


इराणने रविवारी (८ मार्च) सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात निवासी भागात एक प्रोजेक्टाइल पडल्याने सुरुवातीला एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र रियाधमधील भारतीय दूतावासाने आज म्हणजेच सोमवार ९ मार्च रोजी स्पष्ट केले की या हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. तसेच त्यांनी सांगितले की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, आम्ही सौदी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत.



भारतीय नागरिकाच्या मृत्यूची बातमी चुकीची :


यापूर्वी सौदी नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स) अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले होते की अल-खरज शहरात झालेल्या या घटनेत मृत्यू झालेल्या दोन जणांमध्ये एक भारतीय आणि एक बांगलादेशी नागरिक होता. मात्र आता भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकाच्या मृत्यूची बातमी चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.



काय सांगितले भारतीय दूतावासाने :


भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले, “काल संध्याकाळी अल-खरज येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.” दूतावासाने पुढे सांगितले, “कौन्सुलर अधिकारी वाय. साबिर काल रात्री अल-खरज येथे गेले होते आणि या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या भारतीय नागरिकाची त्यांनी भेट घेतली.” दूतावासाने पुढे माहिती दिली की सध्या त्या जखमी व्यक्तीवर अल-खरजमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, सौदी प्रवक्त्यांनी म्हटले की नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न हे आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्याचे उघड उल्लंघन आहे आणि अशा प्रकरणांमध्ये निर्धारित प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. तसेच सौदी अरेबियाने निवेदन जारी करत सांगितले की इराणी हल्ल्यांमुळे देशात संताप वाढत आहे.दरम्यान, भारतीय दूतावासाने रविवारी आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली. यात नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षा मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनांचे प्रामाणिकपणे पालन करण्यास सांगितले आहे. दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “या प्रदेशातील आणि सौदी अरेबियातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सध्या सौदी अरेबियामध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे,” असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भारताचा शेषनाग १५० ड्रोन, नवं घातक शस्त्र

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत

Crude Oil Purchases : भारताच्या कच्च्या तेलाच्या खरेदीत वाढ; आफ्रिकेसह अमेरिका, रशिया आणि लॅटिन अमेरिकेतून कच्च्या तेलाची खरेदी वाढली

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि होर्मुज जलसंधीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून

इराण-इस्त्रायल संघर्षानंतर ५२ हजारांहून अधिक भारतीय मायदेशी

नवी दिल्ली : इराण-इस्त्रायल संघर्षानंतर पश्चिम आशियातील काही देशांमध्ये हवाई क्षेत्र अंशतः पुन्हा सुरू

भारतातील पहिल्या खासगी व्यावसायिक रॉकेट विक्रम १ चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील स्पेसटेक स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसच्या इन्फिनिटी

'तेल खरेदीसाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही'

रशियाकडून खरेदीबाबत भारत ठाम नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जिथे मिळेल तिथून कमीत कमी किमतीत तेल खरेदी करेल.