टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने केले हे विक्रम

अहमदाबाद : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड असा सामना सुरू आहे. या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकांत ५ बाद २५५ धावा केल्या. ही टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमधील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. भारताने आपल्या इनिंगमध्ये तब्बल १८ षटकार आणि १९ चौकार मारले. जेम्स नीशमने संजू, इशान आणि सूर्यकुमार या तिघांना बाद केले तर मॅट हेन्रीने हार्दिकला आणि रचिन रवींद्रने अभिषेकला बाद केले.



संजू सॅमसनचे शतक सलग तिसऱ्या सामन्यात हुकले. फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध आणि सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध तो ८९ धावा करुनच बाद झाला. टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमधील आतापर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. फायनलमध्ये त्याने ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक केले. अभिषेकला अखेर फायनलमध्ये सूर गवसला. त्याने १८ चेंडूत अर्धशतक केले आणि टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या नॉकआऊटमध्ये सर्वात वेगाने अर्धशतक करण्याची किमया साधली. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पहिल्या सहा षटकांचा समावेश पॉवरप्लेमध्ये होतो. या पॉवरप्लेमध्ये क्षेत्ररक्षणावर निर्बंध लागू असतात. यामुळे चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे अभिषेकने पॉवरप्लेमध्ये ५१ धावा केल्या. याआधी २०२४ च्या टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मानेही पॉवरप्लेमध्ये ५१ धावा केल्या होत्या.




  1. संजू सॅमसन - ४६ चेंडूत ८९ धावा, ८ षटकार आणि ५ चौकार

  2. अभिषेक शर्मा - २१ चेंडूत ५२ धावा, ३ षटकार आणि ६ चौकार

  3. इशान किशन - २५ चेंडूत ५४ धावा, ४ षटकार आणि ४ चौकार

  4. हार्दिक पांड्या - १३ चेंडूत १८ धावा, १ षटकार आणि १ चौकार

  5. सूर्यकुमार यादव - एक चेंडू आणि शून्य धावा

  6. तिलक वर्मा - ६ चेंडूत नाबाद ८ धावा

  7. शिवम दुबे - ८ चेंडूत नाबाद २६ धावा, २ षटकार आणि ३ चौकार

Comments
Add Comment

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय

Ishan Kishan : सामन्याच्या आधी इशान किशनवर दुःखाचा डोंगर; इशानने विजयाचं श्रेय दिलं या व्यक्तीला

मुंबई : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत

जेम्स नीशमच्या ‘त्या’ षटकामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक

मुंबई (प्रतिनिधी) : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वादार फलंदाजी पाहायला

संजू सॅमसन बनला क्रिकेट विश्वाचा नवा ‘फायनल बॉस’!

कोहली-सॅम्युअल्स-विल्यमसनचे रेकॉर्ड्स धुळीस अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारतीय फलंदाज संजू सॅमसनने टी-२० विश्वचषक

अभिषेक शर्माने नॉकआउटमध्ये विक्रमी अर्धशतकासह रचला इतिहास

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील नॉकआउटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक