गोरेगाव भागात मंगळवारी राहणार पाणीकपात

उड्डाणपुलाच्या मार्गातील ७५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी वळवणार


मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील उड्डाणपुलाच्या पोहोच रस्ता भागात येणाऱ्या ७५० मिलीमीटर व्यासाच्या वळविण्यात आलेल्या जलवाहिनीच्या छेद जोडणीचे काम मंगळवार १० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून बुधवार ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. या २४ तासांच्या कालावधीत ‘पी पूर्व’ आणि ‘पी दक्षिण’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.


परिसरातील नागरिकांनी, पाणीपुरवठा बंद असण्याच्या अगोदरच्या दिवशी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे तसेच महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. या दुरुस्ती कामाच्या प्रत्यक्ष कालावधीत ‘पी पूर्व’ आणि ‘पी दक्षिण’ विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद तर काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.



विभाग परिसर -


पी पूर्व विभाग : शिवशाही प्रकल्प,(पाणीपुरवठा बंद राहील)


पी पूर्व विभाग : श्रीकृष्ण नगर, इंदिरा गांधी संशोधन संस्था (पाणीपुरवठा बंद राहील)


पी दक्षिण विभाग : सॅटेलाईट टॉवर, संतोष नगर, माळी नगर, हबळे पाडा, उमरशेट पाडा, नगरमोडे पाडा, सुनील मैदान, फिल्म सिटी मार्गालगतचा परिसर ( पाणीपुरवठा बंद राहील)


पी दक्षिण विभाग : मोहन गोखले मार्ग, कृष्णा वाटिका मार्ग, साई मार्ग व आर्य भास्कर मार्ग (कमी दाबाने पाणीपुरवठा)

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन