कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

मुंबई(प्रतिनिधी): राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा विस्तार करून आता त्यात शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांवरील वीज बिलाचा भार हलवण्यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना' यापुढेही सुरू राहणार असून, यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी २० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद आहे. फेब्रुवारी २०२६ पर्यंत या योजनेसाठी ३२ हजार ७५६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. दुसरीकडे, 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०' अंतर्गत १६ हजार मेगावॅट ऊर्जाक्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे राज्यातील १०० टक्के कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.


सौर कृषीपंपांच्या वाटपात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात ६ लाख ६३ हजार ३२४ पंप देण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे पारंपरिक वीज जोडणीवरील अवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च घटण्यास मदत झाली आहे.


राज्य आणि जिल्हास्तरीय पशुधन योजनांचे एकत्रिकरण करून सरकारने नवीन 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना' जाहीर केली आहे. यातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.


आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गो-पालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालक महिलांसाठी विशेष कल्याणकारी कार्यक्रम राबवले जाणार आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती