कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

मुंबई(प्रतिनिधी): राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा विस्तार करून आता त्यात शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांवरील वीज बिलाचा भार हलवण्यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना' यापुढेही सुरू राहणार असून, यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी २० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद आहे. फेब्रुवारी २०२६ पर्यंत या योजनेसाठी ३२ हजार ७५६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. दुसरीकडे, 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०' अंतर्गत १६ हजार मेगावॅट ऊर्जाक्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे राज्यातील १०० टक्के कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.


सौर कृषीपंपांच्या वाटपात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात ६ लाख ६३ हजार ३२४ पंप देण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे पारंपरिक वीज जोडणीवरील अवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च घटण्यास मदत झाली आहे.


राज्य आणि जिल्हास्तरीय पशुधन योजनांचे एकत्रिकरण करून सरकारने नवीन 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना' जाहीर केली आहे. यातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.


आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गो-पालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालक महिलांसाठी विशेष कल्याणकारी कार्यक्रम राबवले जाणार आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Zeeshan Siddique : सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे झिशान सिद्दीकींची आमदारकी अडचणीत ?

मुंबई : झिशान सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदारकीची शपथ घेतली.

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Radhakrishna Vikhe Patil : “जरांगेंचं समाधान होत असेल तर राजीनाम्यास तयार”; विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य

अहिल्यानगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं असून, मराठा आंदोलक नेते मनोज

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट