कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

मुंबई(प्रतिनिधी): राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा विस्तार करून आता त्यात शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांवरील वीज बिलाचा भार हलवण्यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना' यापुढेही सुरू राहणार असून, यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी २० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद आहे. फेब्रुवारी २०२६ पर्यंत या योजनेसाठी ३२ हजार ७५६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. दुसरीकडे, 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०' अंतर्गत १६ हजार मेगावॅट ऊर्जाक्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे राज्यातील १०० टक्के कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.


सौर कृषीपंपांच्या वाटपात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात ६ लाख ६३ हजार ३२४ पंप देण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे पारंपरिक वीज जोडणीवरील अवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च घटण्यास मदत झाली आहे.


राज्य आणि जिल्हास्तरीय पशुधन योजनांचे एकत्रिकरण करून सरकारने नवीन 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना' जाहीर केली आहे. यातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.


आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गो-पालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालक महिलांसाठी विशेष कल्याणकारी कार्यक्रम राबवले जाणार आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Iran - America War : इराणवर मोठा दबाव! ट्रम्प यांचा थेट इशारा; पुढील ३ दिवस निर्णायक

इराणवरील दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका

IPL 2026 : अंगक्रिश रघुवंशीची विकेट वादात, 'क्षेत्ररक्षणात अडथळा' म्हणजे काय?

मुंबई : आयपीएल २०२६ चा ३८ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात,

Lashkar-e-Taiba : पाकिस्तानात दहशतवाद्यांचा एकामागोमाग एक खात्मा! लष्कर-ए-तैबाच्या टॉप कमांडरची गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांवर पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांनी निशाणा साधला आहे. शेख युसूफ आफ्रिदी (Sheikh Yousuf

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

IPL 2026 GT vs CSK : गुजरातकडून चेन्नईचा घरच्याच मैदानावर लाजिरवाणा पराभव!

आयपीएल २०२६ च्या ३७ व्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गुजरातने चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर,

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील