राज्यात लवकरच ७५ हजार पदांची भरती

मुंबई(प्रतिनिधी): राज्याचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी सरकारने 'सुशासना'वर भर दिला असून, प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र बदल करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. महायुती सरकारने आतापर्यंत १ लाख २० हजार पदांची भरती पूर्ण केल्यानंतर, आता आणखी ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यासोबतच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र विभाग व धोरण आखले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय कामात सुलभता आणण्यासाठी 'आपले सरकार २.०', 'मैत्री २.०' आणि 'महाडीबीटी २.०' ही पोर्टल्स नव्याने विकसित केली जातील. संपूर्ण जमीन व्यवहार संगणीकृत करणे आणि ई-ऑफिसच्या माध्यमातून १०० टक्के 'पेपरलेस' कामकाज करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. एआय, क्वांटम संगणन, ड्रोन आणि डीपटेक क्षेत्रात महाराष्ट्राला जागतिक केंद्र बनवण्यासाठी विशेष धोरण आणले जाईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटीसाठी स्वतंत्र विभाग व आयुक्तालय स्थापन करून स्वतंत्र माहिती-तंत्रज्ञान संवर्ग तयार केला जाईल. मालमत्ता वादांना आळा घालण्यासाठी 'महाराष्ट्र भूमी मालकी हक्कधारी अधिनियम' लागू
केला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.


आपत्ती व्यवस्थापनाला नवे बळ


नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा सामना करण्यासाठी नागपूरमधील मिहान येथे 'राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था' स्थापन केली जाणार आहे. तसेच, एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात एसडीआरएफच्या (नवीन ४ तुकड्या तैनात केल्या जातील. त्याचप्रमाणे 'महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अप्लिकेशन सेंटर'ची स्थापना केली जाणार आहे. वाहतूक नियमन आणि सुरक्षिततेसाठी इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचा विस्तार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


पोलिसांना मिळणार बॉडी वॉर्न कॅमेरे


वाढते सायबर गुन्हे लक्षात घेता राज्याचे स्वतंत्र 'सायबर सुरक्षा धोरण' तयार केले जाणार आहे. तसेच नागपूर येथे अत्याधुनिक 'स्टेट डेटा सेंटर' उभारून राज्याचा डेटा सुरक्षित केला जाईल. पोलिसांच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने पोलिसांना अत्याधुनिक 'बॉडी वॉर्न कॅमेरे' दिले जातील. नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १०० टक्के डिजिटायझेशन आणि सर्व जिल्ह्यांत प्रगत न्यायसहाय्यक केंद्रे उभारली जातील,
अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

Comments
Add Comment

NEET Paper Leak 2026 : NEET फेरपरीक्षेसाठी सरकारचा मास्टरप्लॅन! पेपर सुरक्षेसाठी आता थेट वायूदलाची एन्ट्री

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर

कोणत्याही वाहतूकदारास कार्यादेश नाही; पुढील निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसारच – अन्न नागरी पुरवठा विभाग

नवीन अन्नधान्य वाहतूक निविदांबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाचा खुलासा मुंबई : राज्यातील अन्नधान्य वाहतूक निविदा

Ajmer Former Sarpanch Murder Case : अजमेरमध्ये थरकाप उडवणारी घटना! स्कॉर्पिओत माजी सरपंचांसह चौघांना जिवंत जाळलं; अपघाताचा बनाव उघडकीस

अजमेर : राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. माजी सरपंच,

Weather :महाराष्ट्र सह इतर राज्यांना धोक्याचा इशारा . . . १००किमी प्रतिसर वेगाने येणार वादळी वारे ...

मुंबई : महाराष्ट्र सह इतर राज्यात वादळी वारे येण्याची शक्यता हवामान विभाग खात्याने दर्शवली आहे . वाढत्या

First Indigenous Hydrogen Train : ‘ग्रीन ट्रॅक’वर भारताची झेप! पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वे लवकरच धावणार

नवी दिल्ली : हरित आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दिशेने भारताने मोठे पाऊल टाकले असून, देशातील पहिली स्वदेशी

Ukrainian President Zelensky : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की स्वीडनमध्ये दाखल; संरक्षण सहकार्य, ड्रोन तंत्रज्ञानावर चर्चा

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Ukrainian President Zelensky) गुरुवारी स्वीडनच्या दौऱ्यावर पोहोचले. तेथे त्यांनी