राज्यात लवकरच ७५ हजार पदांची भरती

मुंबई(प्रतिनिधी): राज्याचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी सरकारने 'सुशासना'वर भर दिला असून, प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र बदल करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. महायुती सरकारने आतापर्यंत १ लाख २० हजार पदांची भरती पूर्ण केल्यानंतर, आता आणखी ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यासोबतच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र विभाग व धोरण आखले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय कामात सुलभता आणण्यासाठी 'आपले सरकार २.०', 'मैत्री २.०' आणि 'महाडीबीटी २.०' ही पोर्टल्स नव्याने विकसित केली जातील. संपूर्ण जमीन व्यवहार संगणीकृत करणे आणि ई-ऑफिसच्या माध्यमातून १०० टक्के 'पेपरलेस' कामकाज करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. एआय, क्वांटम संगणन, ड्रोन आणि डीपटेक क्षेत्रात महाराष्ट्राला जागतिक केंद्र बनवण्यासाठी विशेष धोरण आणले जाईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटीसाठी स्वतंत्र विभाग व आयुक्तालय स्थापन करून स्वतंत्र माहिती-तंत्रज्ञान संवर्ग तयार केला जाईल. मालमत्ता वादांना आळा घालण्यासाठी 'महाराष्ट्र भूमी मालकी हक्कधारी अधिनियम' लागू
केला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.


आपत्ती व्यवस्थापनाला नवे बळ


नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा सामना करण्यासाठी नागपूरमधील मिहान येथे 'राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था' स्थापन केली जाणार आहे. तसेच, एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात एसडीआरएफच्या (नवीन ४ तुकड्या तैनात केल्या जातील. त्याचप्रमाणे 'महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अप्लिकेशन सेंटर'ची स्थापना केली जाणार आहे. वाहतूक नियमन आणि सुरक्षिततेसाठी इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचा विस्तार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


पोलिसांना मिळणार बॉडी वॉर्न कॅमेरे


वाढते सायबर गुन्हे लक्षात घेता राज्याचे स्वतंत्र 'सायबर सुरक्षा धोरण' तयार केले जाणार आहे. तसेच नागपूर येथे अत्याधुनिक 'स्टेट डेटा सेंटर' उभारून राज्याचा डेटा सुरक्षित केला जाईल. पोलिसांच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने पोलिसांना अत्याधुनिक 'बॉडी वॉर्न कॅमेरे' दिले जातील. नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १०० टक्के डिजिटायझेशन आणि सर्व जिल्ह्यांत प्रगत न्यायसहाय्यक केंद्रे उभारली जातील,
अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

Comments
Add Comment

Nashik TCS Case : निदा खानच्या आजच्या पहिल्या सुनावणीत न्यायालयात घडलं ?

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली. गेले 25 दिवस निदा खान

TVK crosses 118 mark : तमिळनाडूत थलपती विजय यांचा मास्टरस्ट्रोक! एका झटक्यात फिरवला गेम, सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला

तमिळनाडू : तमिळनाडूच्या राजकीय मैदानातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड समोर येत आहे. अनेक दिवसांपासून सुरू

Team India new coach : गौतम गंभीर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, शेवटी...

भारतीय क्रिकेट विश्वातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघ हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहेच पण

Sanjay Shirsat Criticized Imtiaz Jaleel : “निदा खानला इम्तियाज जलील यांचा आश्रय”; मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील

Nagpur Crime : २१ वर्षीय सावत्र मुलाने २६ वर्षीय सावत्र आईवर नको नको ते केलं अन्...नागपुरात नात्याला काळिमा!

नागपूर : नागपूर शहरातून (Nagpur News) माणुसकीला आणि पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक

Nashik TCS Case : निदा खानचे मेडिकल रिपोर्ट समोर, निदा गर्भवती ? महत्त्वाची माहिती उघड

Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर, लैंगिक शोषण आणि मानसिक छळ प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान (Nida Khan)