'अल-निनो'मुळे राज्यावर दुष्काळाचे संकट

मुंबई : 'अल-निनो'च्या संभाव्य धोक्यामुळे यंदा मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची आणि राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, पिण्याचे पाणी राखून ठेवण्यासह जलयुक्त शिवार आणि जलसंधारण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकारने विशेष उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात हजारो कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.


दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांना गती दिली आहे. यामध्ये विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी ९४ हजार ९६८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासोबतच दमणगंगा-वैतरणा-गोदावरी प्रकल्पासाठी १३ हजार ४९७ कोटी रुपये. नार-पार गिरणा नदीजोड ७ हजार ४६५ कोटी रुपये, दमणगंगा-एकदरे-गोदावरी प्रकल्पासाठी २ हजार २१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रासाठी 'निरा-कर्‍हा' नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे.


कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी बसणारा पुराचा फटका टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने २ हजार २४० कोटींचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी आता भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तहानलेल्या भागांकडे वळवले जाईल. तसेच वैतरणा व उल्हास खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी गोदावरीत वळवण्यासाठी 'डीपीआर'ची कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


राज्य जल माहिती केंद्र स्थापन करणार


राज्यातील जलसंपत्तीची नेमकी आणि ऑनलाईन माहिती मिळवण्यासाठी नाशिक येथे 'राज्य जल माहिती केंद्र' स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी ७१.२० कोटी रुपये खर्च केले जातील. तसेच २०४७ ची गरज ओळखून ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर आणि शहरी भागात १३५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.


सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करणार


शहरी भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने ५ हजार ८६० कोटींचा 'महाराष्ट्र नागरी जलपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन' प्रकल्प राबवण्यात येईल. याद्वारे नागरी सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करून त्याचा प्रभावी पुनर्वापर करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. दुष्काळाच्या सावटात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 'वैरण विकास' उपाययोजनांवरही भर देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 Final : आज अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला; आरसीबी की गुजरात? दुसऱ्या जेतेपदासाठी दोन्ही संघ सज्ज...

RCB VS GT : आयपीएल (IPL) 2026 च्या अंतिम लढतआज गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात लढत होणार आहे.

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा

Mann Ki Baat : पंतप्रधानांकडून खेळाडूंच्या कामगिरीची प्रशंसा

- १०० मीटर शर्यतीचे नवे विक्रमवीर गुरिंदरवीर सिंग आणि अनिमेश कुजूर यांच्याशी संवाद नवी दिल्ली : 'मन की बात'च्या

ED Director Satyavrat Kumar : नीरव मोदी ते नवाब मलिक प्रकरणांचे तपासकर्ते; ईडीचे वरिष्ठ अधिकारी सत्यव्रत कुमार यांची अचानक स्वेच्छानिवृत्ती

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अनेक गाजलेल्या आणि हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास करणारे विशेष संचालक

Himachal Accident : हिमाचलमध्ये भीषण दुर्घटना! छत्तीसगडच्या पर्यटकांची कार ५०० फूट दरीत कोसळली; ८ जणांच्या मृत्यूची भीती

शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक हृदयद्रावक अपघात घडला असून छत्तीसगडमधील पर्यटकांना घेऊन जाणारी कार

Pratap Sarnaik : " एसटी च्या उपहारगृहात मंत्र्यांची साधी-सरळ भेट; ... प्रवाशांसोबत गरमागरम वडापावचा आस्वाद!"

संगमेश्वर बसस्थानकातील अनोखा अनुभव; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जिंकली प्रवाशांची मने एसटी बसस्थानक