Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...

पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गर्भाशयातील साधी गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करायला गेलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचे डॉक्टरांनी तिची कोणतीही संमती नसताना थेट गर्भाशयच काढून टाकले. याप्रकरणी मांजरी पोलिसांनी साई केअर हॉस्पिटलमधील चार डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.



नेमकं घडलं काय?



तक्रारदार महिलेच्या गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे २०२३ मध्ये सोनोग्राफी अहवालात समोर आले होते. उपचारासाठी त्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी मांजरीतील साई केअर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. डॉक्टरांनी त्यांना लेझर शस्त्रक्रियेद्वारे केवळ गाठ काढावी लागेल, असे आश्वासन दिले होते. १५ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि १७ सप्टेंबरला त्यांना घरी सोडण्यात आले.



तपासणीत धक्कादायक सत्य समोर



शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी महिलेला शारीरिक त्रास जाणवू लागला. त्या पुन्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेल्या असता, डॉक्टरांनी गाठ काढण्याऐवजी संपूर्ण गर्भाशयच काढून टाकल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेपूर्वी महिलेने केवळ गाठ काढण्याची परवानगी दिली होती, गर्भाशय काढण्याबाबत कोणतीही संमती दिलेली नव्हती. याबाबत डॉक्टरांना जाब विचारला असता, त्यांनी कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.


याप्रकरणी पीडितेने मांजरी पोलीस ठाण्यात पोलिसांनी डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सूरज कांबळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब) आणि ३ (५) अन्वये निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

Nagpur Blast : नागपूर कारखाना स्फोट; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नागपूर येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला, आणि

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित