अमेरिका - इराण युद्धाचा वर्ल्डकपवर परिणाम, आयसीसीची यंत्रणा लागली कामाला

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात संयुक्तपणे हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. लढाई सुरू झाल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत किंवा पुढे ढकलण्यात आली आहेत. विमानांच्या वेळापत्रकात झालेल्या या बदलामुळे अनेक विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. या घडामोडींचा परिणाम आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या आयोजनावरही दिसू लागला आहे.


आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार आता सुपर आठ फेरीचे शेवटचे दोन सामने उरले आहेत. यातील पहिला सामना रविवारी १ मार्च रोजी दुपारी तीन वाजता झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तर दुसरा सामना याच दिवशी संध्याकाळी सात वाजता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. हे दोन्ही सामने भारतात आहेत. यानंतर ४ आणि ५ मार्च रोजी सेमी फायनल आणि ८ मार्च रोजी फायनल असे एकूण तीन सामने होणार आहेत. हे सामने पण भारतात होणार आहेत. यामुळे वर्ल्डकपशी संबंधित सर्व खेळाडू तसेच आयसीसीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना आता भारतातच वेगवेगळ्या शहरांमध्ये विमानांतून प्रवास करायचा आहे. भारताबाहेर स्पर्धेचा आता एकही सामना खेळवला जाणार नाही.


सुरू असलेल्या लढाईमुळे भारतातल्या देशांतर्गत विमान वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही. यामुळे वर्ल्डकपच्या आयोजनात कोणताही अडथळा येणार नाही. पण आव्हान संपलेल्या संघांना तसेच स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीच्या अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांना आपापल्या देशात जाण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. ही शक्यता विचारात घेऊन आयसीसीने विविध आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी संपर्क साधला आहे. प्रवास सुरक्षितरित्या व्हावा यासाठी नियोजन केले आहे. आयसीसीने यासाठी एक ट्रॅव्हल सपोर्ट डेस्कही सक्रिय केला आहे. त्यामुळे खेळाडू तसेच आयसीसीचे अधिकारी - कर्मचारी यांची गैरसोय दूर केली जाईल.


सुपर एट फेरीतले ग्रुप दोनचे सर्व सामने झाले आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र झाले आहेत. ग्रुप एकमधून दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी पात्र झाली आहे. झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ धावगती सुधारण्यास उत्सुक आहे. तर भारत आणि वेस्ट इंडिज हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. विजेता संघ सेमी फायनल खेळणार आहे आणि हरणाऱ्याचे स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. यामुळे या सामन्यात काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 : आयपीएल २०२६ ला दुखापतींचं ग्रहण; अनेक क्रिकेटपटूंच्या दुखापतींमुळे फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असतानाच, अनेक संघ दुखापतींशी झुंजत आहेत. १० पैकी आठ

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच

खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील