अमेरिका - इराण युद्धाचा वर्ल्डकपवर परिणाम, आयसीसीची यंत्रणा लागली कामाला

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात संयुक्तपणे हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. लढाई सुरू झाल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत किंवा पुढे ढकलण्यात आली आहेत. विमानांच्या वेळापत्रकात झालेल्या या बदलामुळे अनेक विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. या घडामोडींचा परिणाम आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या आयोजनावरही दिसू लागला आहे.


आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार आता सुपर आठ फेरीचे शेवटचे दोन सामने उरले आहेत. यातील पहिला सामना रविवारी १ मार्च रोजी दुपारी तीन वाजता झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तर दुसरा सामना याच दिवशी संध्याकाळी सात वाजता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. हे दोन्ही सामने भारतात आहेत. यानंतर ४ आणि ५ मार्च रोजी सेमी फायनल आणि ८ मार्च रोजी फायनल असे एकूण तीन सामने होणार आहेत. हे सामने पण भारतात होणार आहेत. यामुळे वर्ल्डकपशी संबंधित सर्व खेळाडू तसेच आयसीसीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना आता भारतातच वेगवेगळ्या शहरांमध्ये विमानांतून प्रवास करायचा आहे. भारताबाहेर स्पर्धेचा आता एकही सामना खेळवला जाणार नाही.


सुरू असलेल्या लढाईमुळे भारतातल्या देशांतर्गत विमान वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही. यामुळे वर्ल्डकपच्या आयोजनात कोणताही अडथळा येणार नाही. पण आव्हान संपलेल्या संघांना तसेच स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीच्या अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांना आपापल्या देशात जाण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. ही शक्यता विचारात घेऊन आयसीसीने विविध आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी संपर्क साधला आहे. प्रवास सुरक्षितरित्या व्हावा यासाठी नियोजन केले आहे. आयसीसीने यासाठी एक ट्रॅव्हल सपोर्ट डेस्कही सक्रिय केला आहे. त्यामुळे खेळाडू तसेच आयसीसीचे अधिकारी - कर्मचारी यांची गैरसोय दूर केली जाईल.


सुपर एट फेरीतले ग्रुप दोनचे सर्व सामने झाले आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र झाले आहेत. ग्रुप एकमधून दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी पात्र झाली आहे. झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ धावगती सुधारण्यास उत्सुक आहे. तर भारत आणि वेस्ट इंडिज हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. विजेता संघ सेमी फायनल खेळणार आहे आणि हरणाऱ्याचे स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. यामुळे या सामन्यात काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs WI : दोन्ही संघासाठी करो वा मरोची लढत; जाणून घ्या Playing XI मध्ये कोणाकोणाची समावेश

टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून ग्रुप ए मधील फक्त दोन सामने बाकी आहेत. यामध्ये एक

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले