आंध्र प्रदेशच्या काकीनाड्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्हा येथील सामरलकोट मंडलमधील वेटलापालेम गावात एका फटाका निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान १८ जणांचा जळून मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. स्फोटाच्या वेळी कारखान्यात जवळपास ३० कामगार उपस्थित होते अशी माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


प्राथमिक माहितीनुसार, काही महिला कामगार कारखान्याच्या आत स्फोटक साहित्य तयार करत असताना अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट इतका प्रचंड होता की संपूर्ण कारखान्याची इमारत क्षणात जमीनदोस्त झाली. अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात असून बचाव पथके युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याचा मालक घटनेनंतर फरार झाला आहे.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता इतकी होती की काही मृतदेह शेजारच्या शेतात जाऊन पडले. स्फोटानंतर अनेक तास कारखान्यातून अधूनमधून लहानमोठे स्फोट होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दाट धुरामुळे आसपासच्या किमान पाच गावांवर परिणाम झाला असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.


घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने मदतकार्य राबवण्याचे आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश दिले. त्यांच्या निर्देशानुसार राज्याच्या गृहमंत्री वांगलापुडी अनीता घटनास्थळी रवाना झाल्या असून त्या परिस्थितीवर वैयक्तिक लक्ष ठेवणार आहेत. सध्या मुख्यमंत्री विजयनगरम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.


चंद्रबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शोक व्यक्त करत या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी पीडित कुटुंबांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले असून संपूर्ण घटनेवर सरकारचे बारकाईने लक्ष असल्याचे नमूद केले आहे.


दरम्यान, या दुर्घटनेमागील नेमके कारण काय याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित कारखान्याकडे वैध परवाना होता का, तसेच सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचा तपास प्रशासन करत आहे. याच गावात यापूर्वीही अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती, त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Supreme Court : अन्य धर्म स्वीकारल्यास एससी-एसटी दर्जा होणार रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी अधिनियमासंदर्भात आज, मंगळवार २४ मार्च रोजी मोठा निर्णय दिला आहे.

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर