आंध्र प्रदेशच्या काकीनाड्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्हा येथील सामरलकोट मंडलमधील वेटलापालेम गावात एका फटाका निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान १८ जणांचा जळून मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. स्फोटाच्या वेळी कारखान्यात जवळपास ३० कामगार उपस्थित होते अशी माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


प्राथमिक माहितीनुसार, काही महिला कामगार कारखान्याच्या आत स्फोटक साहित्य तयार करत असताना अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट इतका प्रचंड होता की संपूर्ण कारखान्याची इमारत क्षणात जमीनदोस्त झाली. अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात असून बचाव पथके युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याचा मालक घटनेनंतर फरार झाला आहे.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता इतकी होती की काही मृतदेह शेजारच्या शेतात जाऊन पडले. स्फोटानंतर अनेक तास कारखान्यातून अधूनमधून लहानमोठे स्फोट होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दाट धुरामुळे आसपासच्या किमान पाच गावांवर परिणाम झाला असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.


घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने मदतकार्य राबवण्याचे आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश दिले. त्यांच्या निर्देशानुसार राज्याच्या गृहमंत्री वांगलापुडी अनीता घटनास्थळी रवाना झाल्या असून त्या परिस्थितीवर वैयक्तिक लक्ष ठेवणार आहेत. सध्या मुख्यमंत्री विजयनगरम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.


चंद्रबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शोक व्यक्त करत या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी पीडित कुटुंबांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले असून संपूर्ण घटनेवर सरकारचे बारकाईने लक्ष असल्याचे नमूद केले आहे.


दरम्यान, या दुर्घटनेमागील नेमके कारण काय याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित कारखान्याकडे वैध परवाना होता का, तसेच सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचा तपास प्रशासन करत आहे. याच गावात यापूर्वीही अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती, त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Israel - Iran War : भारतीय दूतावासाकडून इस्रायलमधील नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

INS Anjdip : शत्रूला धडकी भरणार! 'आयएनएस अंजदीप' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

चेन्नई : आयएनएस अंजदीप, ही पाणबुडी विरोधी युद्धनौका , ‘शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील

National Science Day 2026 : विकास आणि कल्याणासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करा - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा देत भारताच्या

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर