पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील टाकवहाल परिसरातील बंद पडलेल्या दगड खाणीत ही दुर्घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.



नेमकं काय घडलं ?


मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाजवळ असलेल्या खाणीत शुक्रवारी दुपारी काही मुले पोहण्यासाठी उतरली होती. मात्र पाणी किती खोल असेल याचा अंदाज न आल्याने दोन्हीही मुलांचा बुडून मृत्युज आला आहे. या घटनेत जिग्नेश विजय पवार (वय ८) याचा मृतदेह सापडला आहे. तर आयुष मुकेश पवार (वय १५) याचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. यांचे कुटुंब हे मूळचे इंदोरचे असून रोजगारासाठी पालघरमध्ये मनोर परिसरात कामानिमित्त वास्तव्यास होते.



पोलिसांची शोधमोहीम


घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच वसई -विरार महापालिका अग्निशमन दलाकडून शोधकार्य राबविण्यात आले. या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून बंद खाणींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बंद पडलेल्या खाणींमध्ये साचलेल्या पाण्यामुळे धोका वाढत असल्याची चर्चा आहे. अशा ठिकाणी सुरक्षाव्यवस्था आणि इशारे फलक नसल्याने अपघातांची शक्यता वाढते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

‘दहशतवादाचा नकाशा बदलला’; जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान जगात अव्वल

- जीटीआय अहवालातून समोर आले धक्कादायक आकडे जागतिक दहशतवादाच्या चित्रात मोठा बदल होत असून पाकिस्तान आता जगातील

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत