RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत आहेत. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पाऊले उचलली आहेत. याबाबत नितीन गडकरी यांनी अधिकृत घोषणा केली आहे.



ड्रायव्हिंग लायसन्स बनेल ‘रिपोर्ट कार्ड’


नव्या योजनेनुसार प्रत्येक चालकाच्या लायसन्सवर गुण प्रणाली (पॉइंट्स सिस्टिम) लागू केली जाणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित चालकाच्या लायसन्सवरील ठराविक गुण कमी केले जातील. जर हे गुण ठराविक मर्यादेपेक्षा खाली गेले, तर चालकाचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले जाईल. म्हणजेच त्या कालावधीत वाहन चालवण्यास बंदी असेल.



वारंवार चुका केल्यास कायमस्वरूपी रद्द


गंभीर नियमभंग किंवा वारंवार केलेल्या उल्लंघनांवर अधिक कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकरणांत संबंधित व्यक्तीचे लायसन्स कायमचे रद्द करण्याची तरतूदही असणार आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना पुन्हा परवाना मिळवणे कठीण होऊ शकते.



या उल्लंघनांवर कारवाई ठरणार कठोर


खालील प्रकारच्या चुका वाहनचालकांना महागात पडू शकतात:


वेगमर्यादा ओलांडून वाहन चालवणे
वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर
चुकीच्या दिशेने (राँग साईड) वाहन चालवणे
मद्यपान करून वाहन चालवणे

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या