शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान, बिबट्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि सॅटेलाईट प्रणालीचा वापर करून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती सरकारने दिली.


राज्यात बिबट्यांचा मानवी वस्त्यांमधील शिरकाव ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. गेल्या पाच वर्षांत सुमारे ४२० नागरिकांना या हल्ल्यात प्राण गमवावे लागले आहेत. शिरूरमधील चिमुरडी आणि वृद्ध महिलेच्या मृत्यूच्या घटनेचा संदर्भ देत सभागृहात सदस्यांनी चिंता व्यक्त केली. केवळ २५ लाख रुपयांची मदत देऊन गेलेला जीव परत येणार नाही, त्यामुळे प्रशासनाने हल्ले होऊच नयेत यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षांसह सर्वच सदस्यांनी केली.



अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार बिबट्यांचे 'लोकेशन' ट्रॅकिंग


या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले की, आता बिबट्यांचे अचूक स्थान (Location) शोधण्यासाठी 'एआय' आणि उपग्रह प्रणालीची मदत घेतली जाईल. बिबट्यांचा वावर असलेल्या क्षेत्रातील माहिती रिअल-टाइममध्ये नागरिक आणि स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचवली जाईल. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना सावध राहणे शक्य होईल. याव्यतिरिक्त, ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर जास्त आहे, अशा संवेदनशील भागात 'चेन फेन्सिंग' किंवा 'जाळ्यांचे कुंपण' बसवण्याबाबतही सरकार गांभीर्याने विचार करत आहे.



अहिल्यानगरसह ऊस उत्पादक पट्ट्यासाठी विशेष योजना


अहिल्यानगर (अहमदनगर) सारख्या जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने तिथे बिबट्यांनी आपला अधिवास निर्माण केला आहे. उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले सापडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बिबट्या नियंत्रणासाठी जे प्रकल्प यशस्वी झाले आहेत, ते महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याची सूचना सभागृहात करण्यात आली. या कामासाठी विशेष निधीची तरतूद करण्याचे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

१ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा