घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य सरकारने गंभीरपणे घेतली आहे. महारेराने घरखरेदीदारांच्या नुकसानभरपाईपोटी जारी केलेल्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या आणि वसुलीस दाद न देणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फसवणूक करणाऱ्या अशा बिल्डरांची मालमत्ता जप्त करून त्यातून ग्राहकांची थकीत रक्कम वसूल केली जाईल, अशी घोषणा प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी विधानसभेत केली.


आमदार अतुल भातखळकर, जितेंद्र आव्हाड, सुलभा खोडके, प्रताप पाटील चिखलीकर यांसह अन्य सदस्यांनी महारेराच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सुमारे १ हजार २०० ग्राहकांची ७९२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक आकडेवारी सभागृहात मांडण्यात आली. महारेरा स्थापन झाल्यापासून १ हजार २९१ तक्रारदारांच्या बाजूने ७९२ कोटींचे वसुली आदेश देण्यात आले. मात्र, यातील २०० कोटींचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी 'वसुली शक्य नाही' असे कारण देत परत पाठवले आहेत. यावरून सदस्यांनी संताप व्यक्त करत, 'महारेरा हे घरखरेदीदारांना न्याय देण्याऐवजी विकासकांना मुदतवाढ देणारे एक्स्टेंशन काउंटर झाले आहे का?' असा संतप्त सवाल केला.


सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी वस्तुस्थिती मान्य केली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही तांत्रिक कारणांमुळे वसुली रखडल्याचे त्यांनी सांगितले. "लिलाव यशस्वी न होणे, मालमत्ता न सापडणे, बँकांकडे तारण असलेली मालमत्ता किंवा न्यायालयीन स्थगिती यामुळे वसुलीत अडथळे येत आहेत. मात्र, यावर आता ठोस उपाययोजना केली जाईल," असे देसाई म्हणाले.



अशी होणार कारवाई


प्रभारी मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, ज्या विकासकांनी ग्राहकांचे पैसे परत केलेले नाहीत, त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव केला जाईल. थकीत वसुलीच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. करारातील नमूद क्षेत्रापेक्षा कमी जागा देणाऱ्या बिल्डरांचीही चौकशी केली जाणार आहे. घरखरेदीदारांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. वसुलीसाठी लवकरच व्यापक मोहीम हाती घेऊन सर्वसामान्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास