मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे


मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय भीम-जय मीम’च्या वल्गना करणारे राजकीय पक्ष निवडणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विसरतात आणि केवळ ‘जय मीम’च उरते. संविधानाच्या कुठल्या पानावर महानगरपालिकेत नमाज पठण करण्याची अनुमती आहे, याचे कागद त्यांनी मला दाखवावे, अशा परखड शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव महानगरपालिकेतील नमाजपठणाच्या प्रकारावर जोरदार प्रहार केला. हे धर्मांधांचे ‘जिहाद’चेच रूप आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते विधानभवनात पत्रकारांशी बोलत होते.



तर आम्ही प्रत्येक महानगरपालिकेत भगवद्गीता वाचू :


आमदार नितेश राणे म्हणाले की, महानगरपालिकेत तुम्ही विकास करण्यासाठी निवडून गेला आहात की इस्लामचा प्रसार करण्यासाठी ? नमाज पडण्यासाठी मशिदींना काय टाळी लागली आहेत का ? हे ‘जिहाद’ नाही, तर काय आहे ? जर उद्या आम्ही प्रत्येक महानगरपालिकेत भगवद्गीता वाचायला प्रारंभ केला, तर या ‘हिरव्या सापांनी’ तोंड उघडू नये. तुम्ही नमाज पडला तर चालते; पण हिंदूंनी काही केले की लगेच ‘हिंदू-मुस्लिम वाद’ उकरून काढला जातो.



मदरसे हे केवळ दहशतवादांचे अड्डे :


सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदरशात लहान मुलांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मदरसे हे केवळ दहशतवादांचे अड्डे असून तिथे देशविरोधी कृत्ये घडवली जातात. इस्लामिक राष्ट्रांमध्ये कुणी भगवद्गीता शिकवण्याची अनुमती देईल का ? मग आम्हीच मदरशांचे लाड का करायचे ? मदरशांमध्ये कधी शस्त्रास्त्रे सापडतात, तर कधी मुलांचे शोषण होते. मशिदीत कुराण शिकवा; पण धर्मांधतेचे धडे देणारे स्वतंत्र मदरसे कशाला हवेत ? महाराष्ट्रातील सर्व मदरसे तातडीने बंद करण्यात यावेत, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. मदरशात मुलांना मारहाण करणार्‍या मुल्ला-मौलवी यांना चेतावणी देताना नितेश राणे म्हणाले की, मी त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यांना असा काही धडा शिकवीन की, पुन्हा हात उचलताना ते १० वेळा विचार करतील. हे जिहादी मानसिकतेचे लोक केवळ हिंसाच जाणतात.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी