US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी (२३ फेब्रुवारी) स्पष्ट केले. वाणिज्य मंत्रालय या परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.


नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अमेरिकन टॅरिफ संदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली. व्यापार करारांबाबत भारताचा दृष्टिकोन स्पष्ट असून, भारताने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिरात (यूएई), कतार, ओमान, युरोपियन संघ आणि ब्रिटन यांच्यासोबत व्यापार करार केले आहेत, असे त्यांनी नमूद केले. पुढेही विविध देशांसोबत व्यापार करार करण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले. भारताला आपल्या अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर व्यापार करण्याची आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी मिळावी, अशी भूमिका असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.


सोन्याच्या वाढत्या किमतींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, बाजारात येणारे बहुतांश सोने आयात केलेले असते. देशात मौल्यवान धातूंवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर परदेशांवर आहे. “आपल्याकडे सोने शोधणे आणि उत्खनन करण्याचे स्वतःचे पुरेसे स्रोत नाहीत. यासाठी काही पावले उचलली जात आहेत; मात्र ती देशांतर्गत मागणी भागवण्यासाठी पुरेशी नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.


देशांतर्गत वापरासाठी सोने व चांदीच्या किमतींवर जागतिक बाजारातील वाढीचा थेट परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या अनेक देश, विशेषतः त्यांचे केंद्रीय बँका, मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करून साठवणूक करत आहेत. या केंद्रीय बँकांच्या खरेदीमुळेच किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.


यापूर्वी, केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आयोजित सर्वसाधारण बैठकीत वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासमवेत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाला संबोधित केले.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या