Tahawwur Rana : कुख्यात दहशतवादी तहव्वुर राणाचे कॅनडियन नागरिकत्व रद्द होणार

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्यापूर्वी कॅनडियन सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कॅनडियन सरकारने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य आरोपी तहव्वुर हुसेन राणा याच्याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कॅनडातील मीडिया अहवालानुसार, कॅनडा सरकारने राणाची कॅनडियन नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


अहवालानुसार, कॅनडाच्या ‘इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा’ (आयआरसीसी) या विभागाने राणाला त्याचे कॅनडियन नागरिकत्व रद्द करण्याचा मानस असल्याची औपचारिक सूचना दिली आहे. मात्र ही कारवाई थेट दहशतवादाच्या आरोपांशी संबंधित नसून, नागरिकत्वासाठी अर्ज करताना दिलेल्या कथित चुकीच्या माहितीसंबंधी आहे.


राणा १९९७ मध्ये कॅनडात गेला आणि २००१ मध्ये त्याला कॅनडियन नागरिकत्व मिळाले. आयआरसीसीनुसार, ३१ मे २०२४ रोजी पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले की, राणाने नागरिकत्वासाठी अर्ज करताना कॅनडातील वास्तव्यासंदर्भात चुकीची माहिती दिली होती. २००० साली अर्ज करताना त्याने चार वर्षे ओटावा आणि टोरोंटो येथे वास्तव्य केल्याचा दावा केला होता. त्या काळात फक्त सहा दिवस अनुपस्थित राहिल्याचे त्याने नमूद केले होते.


मात्र ‘रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस’ (आरसीएमपी) यांच्या तपासात तो बहुतेक काळ अमेरिकेतील शिकागो येथे असल्याचे उघड झाले. तेथे त्याच्या अनेक मालमत्ता होत्या आणि तो इमिग्रेशन सल्लागार सेवा तसेच इतर व्यवसाय चालवत होता. हे प्रकरण सध्या कॅनडाच्या ‘फेडरल कोर्ट’मध्ये प्रलंबित आहे. इमिग्रेशन विभागाच्या प्रवक्त्यानुसार, चुकीची माहिती देऊन मिळवलेले नागरिकत्व रद्द करणे ही सरकारच्या प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी आवश्यक कारवाई आहे.


पाकिस्तानी मूळ असलेल्या ६५ वर्षीय तहव्वुर हुसेन राणा सध्या भारतातील कारागृहात असून, २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यांमध्ये मदत केल्याच्या आरोपांवर त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. राणावर डेविड कोलमन हेडली आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा तसेच हरकत-उल-जिहादी इस्लामीशी संबंधित दहशतवाद्यांसोबत मिळून २००८ च्या मुंबई हल्ल्यांची कटकारस्थान रचल्याचा आरोप आहे. २६/११ च्या हल्ल्यांत अधिकृत आकडेवारीनुसार १६६ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो जखमी झाले होते.


अमेरिकेत अटकेनंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. प्रत्यार्पण थांबवण्यासाठी राणाने अमेरिकन न्यायालयांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली, मात्र त्याच्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या. एप्रिल २०२५ मध्ये त्याला भारतात आणण्यात आले आणि ‘राष्ट्रीय तपास यंत्रणा’ (एनआयए) ने त्याला अटक केली. मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उचललेले हे पाऊल भारत-कॅनडा संबंधांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार

Iran-US-Israel War : चीनकडून सर्व देशांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन

पश्चिम आशियात वाढत असलेल्या तणावाच्या आणि हॉर्मुज सामुद्रधुनीवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर चीनने सर्व

पाकिस्तानने केला अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; ४०० लोकांचा मृत्यू २५० हून अधिक जखमी; राशिद खानकडून संताप व्यक्त

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलाने एअरस्ट्राईक केला आहे. पाकिस्तानकडून रहिवाशी परिसर

होर्मुजच्या सामुद्रधुनीवरून नाटो फुटणार, ट्रम्पचा इशारा

होर्मुज सामुद्रधुनीची सुरक्षा करण्यासाठी नाटोने मदत केली नाही तर त्यांचे भविष्य धोक्यात येईल -

आता X वर २८० कॅरेक्टरपलीकडे लिहता येणार; X च नवीन फीचर लाँच

- X वर मिळणार लांबलचक पोस्ट लिहिण्याची संधी सॅन फ्रान्सिस्को : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (Twitter) ने आता