गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात आली मोठी अपडेट

मुंबई : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे हिने वरळीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पती अनंत गर्जेचे अन्य महिलेसोबतचे संबंध असल्याचे कळल्याने आलेल्या नैराश्यातून गौरीने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी समजले होते. पण गौरीच्या कुटुंबियांनी गर्जे कुटुंबाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. गौरीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या छळाला वैतागून गौरीने गळफास घेतल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. कायद्यातील तरतुदीनुसार पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी आरोप आणि संशयाआधारे पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली होती. आता तब्बल तीन महिन्यांनंतर अनंत गर्जेला जामीन मिळाला आहे.


डॉ. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी अनंत गर्जेला मुंबईच्या सत्र न्यायालयाने जामीन दिला. यामुळे तब्बल तीन महिन्यांनी अनंत गर्जे तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.


गौरीने २२ नोव्हेंबर २०२५ रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पती अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक करत चौकशी केली होती. गौरी गर्जेने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप गौरीच्या पालकांनी केला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.


अनंत गर्जे आणि डॉ. गौरी पालवे यांचा विवाह फेब्रुवारी २०२५ मध्ये झाला होता. दोघांचेही मूळ गाव एकच होते. पण मागील काही वर्षांपासून ते दोघेही मुंबईत स्थायिक होते. गौरी गर्जे या केईएम रुग्णालयातील दंत विभागात डॉक्टर होत्या. तर अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे पीए म्हणून काम करत होते. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सुरळीत सुरू होते. पण लवकरच गर्जे दांपत्यात वाद सुरू झाले. यातून परिस्थिती बिकट झाली आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये गौरीने जीवन संपवले. या प्रकरणात कौटुंबिक हिंसाचार, पतीचे अनैतिक संबंध आदी मुद्यांच्याआधारे तपास करून पोलिसांनी संशयावरून आरोपी म्हणून अनंत गर्जेला अटक केली होती.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान; मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मुंबई: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने