विधिमंडळाच्या आवारात अजित पवारांचे स्मृतीस्थान व्हावे - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर; मुख्यमंत्री, गटनेत्यांसमोर प्रस्ताव मांडणार

मुंबई : "दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखे थोर नेते फार कमी होतात. त्यामुळे त्यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्राची सेवा केली, त्याची जाणिव पुढच्या पीढीला होण्यासाठी त्यांच्या नावाचे एक स्मृतीस्थान विधिमंडळाच्या आवारात होणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री, गटनेते आणि बोर्डासमोर प्रस्ताव ठेवून मी निर्णय घेईन", अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी केली.


अजित पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या शोक प्रस्तावावर बोलताना नार्वेकर म्हणाले, "मला माझ्या संसदीय कार्याची पहिली इनिंग सुरु करून दिली ती अजित पवार यांनी. त्यांनी मला पहिल्यांदा विधान परिषदेत काम करायची संधी दिली. त्याआधी मावळ लोकसभेची निवडणूक लढवण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यात जरी यश मिळाले नाही, तरी तुमच्या राजकीय कारकीर्दीची ती सुरुवात असेल, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अवघ्या २८ दिवसांत त्यांनी मला विधान परिषदेत काम करण्याची संधी दिली. शब्दाला जागणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. हा जसा माझा अनुभव आहे, तसाच या सभागृहातील अनेकांचा आहे", असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.



अजितदादांनी दिली शाबासकी


- अजित पवार यांच्या आठवणी सांगताना राहुल नार्वेकर म्हणाले, "मी विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर विधान भवनाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. काम पूर्ण झाल्यानंतर दादांनी माझी प्रशंसा केलीच. पण, कुठे काय कमतरता राहिली, हे देखील आवर्जून निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे सह्याद्री अतिथिगृह हे विधिमंडळाच्या अखत्यारित येत नसले, तरी त्याच्या डागडुजीच्या कामात लक्ष घालून ते नीट करून घ्या, अशी सूचना त्यांनी केली होती".


- त्यांच्या जाण्याने केवळ राज्याची नव्हे, देशाची अपरिमित हानी झालेली आहे. जीएसटी कौन्सिलमधील त्यांच्या कामाची प्रशंसा देशपातळीवर झालेली आहे. जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राची बाजू अजितदादा ज्या तळमळीने मांडायचे, त्याची कसर आपल्याला कायम जाणवत राहील, असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा

Zeeshan Siddique : सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे झिशान सिद्दीकींची आमदारकी अडचणीत ?

मुंबई : झिशान सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदारकीची शपथ घेतली.

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Radhakrishna Vikhe Patil : “जरांगेंचं समाधान होत असेल तर राजीनाम्यास तयार”; विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य

अहिल्यानगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं असून, मराठा आंदोलक नेते मनोज