T20 World Cup 2026 : चालू स्पर्धेत आफ्रिकेच्या संघाची जबाबदारी नवीन कर्णधारावर ?

मुंबई : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या थरारक सामन्यांना आजपासून सुरूवात होत आहे. आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना खेळवला जाणार आहे. तर भारत आणि साऊथ अफ्रिका या दोन बलाढ्य संघांमध्ये उद्या म्हणजेच रविवार २२ फेब्रुवारी रोजी सामना होणार आहे. हा भारताचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना असणार आहे.


मात्र अशातच मिळालेल्या माहितीनुसार चालू स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या कर्णधार पदाची धुरा दुसऱ्या खेळाडूवर सोपवली आहे. मात्र हा कर्णधार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा नाही तर न्यूझीलंड सिरीजचा असणार असल्याचे दक्षिण आफ्रिका बोर्डाने स्पष्ट केले आहे.


लवकरच दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. १५ मार्च पासून या मालिकेला सुरुवात होईल. याच न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजसाठी साऊथ अफ्रिकेने केशव महाराज याची कर्णधारपदी नियुक्ती केली असून नव्या खेळाडूंना या सिरीजमध्ये संधी मिळाली आहे.


दरम्यान, साऊथ अफ्रिकेचा रेग्युलर कॅप्टन अॅडम मार्करम हा या सिरीजमध्ये खेळणार नसल्याने आता केशव महाराज याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

Comments
Add Comment

पाक मिस्ट्री स्पिनर्सना रोखण्याचे 'किवीं'समोर आव्हान

कोलंबो :टी-२० विश्वचषकाच्या 'सुपर-८' फेरीचा थरार आजपासून खऱ्या अर्थाने सुरू होत असून, ग्रुप-२ मध्ये न्यूझीलंड आणि

घटस्फोटाच्या मालिकेत अजून एका क्रिकेटरची भर; "मी हा चॅप्टर क्लोज करतोय" म्हणत क्रिकेटरने केली घटस्फोटाची घोषणा

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट विश्वात घटस्फोटांची मालिका सुरु आहे. अशातच आता या मालिकेत अजून एका

जाएंट किलर संघ भारताच्या वाट्याला...

अहमदाबाद  : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीनंतर आता क्रिकेट चाहत्यांची नजर 'सुपर-८' फेरीकडे लागली आहे. भारतीय

भारत-ऑस्ट्रेलियात आज निर्णायक लढत

कांगारूंच्या भूमीत तिरंगा फडकवण्याची महिला संघाला संधी ॲडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामधील टी-२०

शेवट गोड झाला, ऑस्ट्रेलियाचा ओमान विरूद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा विजय

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा पराभव

R Ashwin : 'भारतीय संघाला हरवणे कठीण'; रविचंद्रन अश्विनने केले सूर्या ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक

भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या गट टप्प्यात अपराजित राहून सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ सध्या