Saturday, February 21, 2026

महाराष्ट्रात एप्रिलपासून मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन

महाराष्ट्रात एप्रिलपासून मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन

निवडणूक आयोगाचे २२ राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी निर्देश

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशव्यापी मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन (एसआयआर) जाहीर केले आहे. मतदार यादीचे सखोल पुनरावलोकन प्रक्रिया १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे. आता एसआयआर उर्वरित २३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविली जाईल. या २३ राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाने सर्व २३ राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून एसआयआरची तयारी सुरू करण्यास सांगितले आहे. एसआयआर १ एप्रिल २०२६ पासून सुरू होऊ शकते.

एसआयआरआधीच बिहारमध्ये राबविण्यात आला आहे. देशातील अंदमान व निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सध्या एसआयआर सुरू आहे. भारतीय निवडणूक आयोगाने १९५१ ते २००४ दरम्यान देशभरात आठ वेळा एसआयआर केले. आता २१ वर्षांनंतर एसआयआर केले जात आहे.

एसआयआर का केले जाते?

 मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन ही प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोग राबवते. यात प्रत्येक मतदाराची ओळख, वय, पत्ता आणि पात्रता पुन्हा तपासली जाते. बूथ लेव्हल ऑफिसर घरोघरी जाऊन माहिती पडताळतात आणि मतदारांकडून माहितीपत्रक भरून घेतात. पडताळणीनंतर मृत, स्थलांतरित किंवा दुबार नोंदी वगळल्या जातात तसेच नवीन पात्र नागरिकांची नावे समाविष्ट केली जातात. याचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवणे हा असतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा