चक्क व्हॉट्सअ‍ॅप वरून बारावीचा पेपर मुलांपर्यंत पोहोचला? नागपुरातील धक्कादायक प्रकार समोर

मुंबई : राज्यात सध्या परीक्षेचे वारे वाहत आहेत, दहावी आणि बारावीची मुले आपल्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा देत आहेत. अशातच नागपूर येथून बारावीचे दोन पेपर फुटल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे.



नेमकं घडल काय ?


नागपूरमधील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थिनीची हालचाल संशयास्पद आढळली. ती वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याने केंद्रातील परीक्षकांनी तिची झडती घेतली. तपासादरम्यान तिच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला.


मोबाईल तपासल्यावर एका व्हॉट्सअ‍ॅपच्या गटामध्ये प्रश्नपत्रिकेतील मजकूर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शेअर झाल्याचे आढळून आले. यात रसायनशात्र आणि भौतिकशास्त्र या पेपरचा समावेश होता. या गटात एकूण १५ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.



शिक्षकावर गंभीर आरोप


चौकशीत दोन विद्यार्थिनींनी एका खासगी शिकवणीतील शिक्षकाने पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा आरोप केल्याचे समजते. संबंधित गटातील इतर १३ विद्यार्थी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत होते.



गुन्हा नोंद, तपास सुरू


केंद्रप्रमुखांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून सखोल तपास सुरू आहे. मोबाईलमधील मेसेज , कॉल रेकॉर्ड आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment

कोकणवासीयांचा 'शिमगा' गोड

मुंबई-विजयदुर्ग जलप्रवासाचा १ मार्चपासून श्रीगणेशा; मंत्री नितेश राणे यांचे स्वप्न साकार मुंबई : कोकणच्या लाल

Kumbhdoot App : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले 'कुंभदूत ॲप'चे अनावरण

- एआय समिटमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय समिट २०२६' मध्ये

सैनिक शाळेत शिकण्याची सुवर्णसंधी

पुणे : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून, उत्तराखंड येथील इयत्ता

नोकरी लावून देतो सांगत २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार; शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगर शहरात शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध

भिगवण प्रकरणाला कलाटणी; मुलीने फिरवली बाजी निवडली पोलिसांची गाडी

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका मधील भिगवण येते घडलेल्या अपहरण प्रकरणाचे दिवसेंदिवस नवीन पैलू उलघडत जात

कानिफनाथ यात्रेत वादाची ठिणगी; मुस्लिम व्यावसायिकांची दुकाने करणार बंद

अहिल्यानगर : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि भटक्यांची पंढरी म्हणेजच श्री क्षेत्र मढीची कानिफनाथ