चक्क व्हॉट्सअ‍ॅप वरून बारावीचा पेपर मुलांपर्यंत पोहोचला? नागपुरातील धक्कादायक प्रकार समोर

मुंबई : राज्यात सध्या परीक्षेचे वारे वाहत आहेत, दहावी आणि बारावीची मुले आपल्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा देत आहेत. अशातच नागपूर येथून बारावीचे दोन पेपर फुटल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे.



नेमकं घडल काय ?


नागपूरमधील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थिनीची हालचाल संशयास्पद आढळली. ती वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याने केंद्रातील परीक्षकांनी तिची झडती घेतली. तपासादरम्यान तिच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला.


मोबाईल तपासल्यावर एका व्हॉट्सअ‍ॅपच्या गटामध्ये प्रश्नपत्रिकेतील मजकूर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शेअर झाल्याचे आढळून आले. यात रसायनशात्र आणि भौतिकशास्त्र या पेपरचा समावेश होता. या गटात एकूण १५ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.



शिक्षकावर गंभीर आरोप


चौकशीत दोन विद्यार्थिनींनी एका खासगी शिकवणीतील शिक्षकाने पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा आरोप केल्याचे समजते. संबंधित गटातील इतर १३ विद्यार्थी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत होते.



गुन्हा नोंद, तपास सुरू


केंद्रप्रमुखांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून सखोल तपास सुरू आहे. मोबाईलमधील मेसेज , कॉल रेकॉर्ड आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक