Ravindra Chavan : वैचारिक दिवाळखोर नेतृत्व असल्यामुळे काँग्रेस देशविरोधी झाली

- काँग्रेसच्या देशविरोधी मानसिकतेविरोधात भाजयुमोचे मुंबईत आंदोलन


मुंबई : 'AI इम्पॅक्ट समिट' मधून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणा-या नव भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडत असताना दुसरीकडे काँग्रेसचे 'शहजादे' वैचारिक दिवाळखोरी आणि नकारात्मकतेपायी देशाला बदनाम करण्याचा कट रचत आहेत. 'ए आय इम्पॅक्ट समिट' या जगातील सर्वात मोठ्या समिटमध्ये भारताला मिळणा-या सन्मानाला गालबोट लावण्यासाठी राहुल गांधींनी आपल्या गुंडांना मैदानात उतरवले. भारताच्या प्रतिमेला कलंक लावण्याचे हे कृत्य लांछनास्पद आहे. राहुल गांधींमुळे काँग्रेस आता AI अर्थात Anti-India (भारत विरोधी) झाली आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला.


भारताची चहुबाजूने होत असलेली प्रगती न पाहवून असुयेपोटी विकसित भारताच्या निर्मितीमध्ये अडथळे आणून अराजक माजवण्याचे काँग्रेसचे कारस्थान असून ते कधीही यशस्वी होणार नाही असेही त्यांनी निक्षून सांगितले.





काँग्रेसच्या या देशविरोधी व लाजिरवाण्या कृत्याचा निषेध मुंबई भाजयुमोतर्फे (भाजप युवा मोर्चा) करण्यात आला. भाजयुमो मुंबईचे महामंत्री दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय, टिळक भवन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. संपूर्ण जग भारताकडे (AI) क्षेत्रातील जागतिक नेतृत्व म्हणून पाहत असताना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट उतरवून “PM is Compromised” तसेच भारत अमेरिका व्यापार करारासंदर्भातील घोषणा देत कार्यक्रमात अराजक निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न हीन असून भाजपा त्याचा धिक्कार करते असे भाजयुमो च्या कार्यकर्त्यांनी म्हटले.



भारताची प्रगती काँग्रेसला सहन होत नाही :


यावेळी भाजयुमो मुंबईचे अध्यक्ष व नगरसेवक तेजिंदर सिंह तिवाना म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय मंचावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली ही कृती अत्यंत निंदनीय आहे. भारताची प्रगती काँग्रेसला सहन होत नाही म्हणूनच अशा प्रकारच्या कृतीतून काँग्रेसने आपली देशविरोधी मानसिकता दाखवून दिली. काँग्रेस पक्षाचे हे वर्तन असभ्य, घोर निंदनीय असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांचा अपमान करून आंतरराष्ट्रीय स्तरावर गोंधळ घालणे हे केवळ लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारे नसून देशाच्या प्रगतीवर आणि युवकांच्या भवितव्यावर आघात करणारे आहे. काँग्रेस पक्षाने तात्काळ माफी मागावी व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



विकासाच्या मार्गातील कोणतीही अडचण सहन केली जाणार नाही :


यावेळी भाजयुमो मुंबईचे महामंत्री दीपक सिंह म्हणाले की, काँग्रेस पक्ष आता पंतप्रधानांचा विरोध करता करता देशाचाच विरोध करू लागला आहे. युवा भारत आता जागृत झाला असून विकासाच्या मार्गातील कोणतीही अडचण सहन केली जाणार नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत AI, तंत्रज्ञान व आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Nashik Simhastha 2027 : कुंभ २०२७साठी एआयची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा, जागतिक कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित

Assembly Election : बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

पुणे : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ पैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली