भारत मंडपममधील आंदोलनातून काँग्रेस देशद्रोही चेहरा समोर आला

शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घणाघाती टीका


चड्डी-बनियान गँगच्या असभ्य गोंधळाबाबत काँग्रेसने जनतेची माफी मागावी


मुंबई : इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमधून जगापुढे भारताचे तंत्रवैभव सादर केले जात असताना भारत मंडपममध्ये युथ काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगने असभ्य गोंधळ घालून भारताची जागतिक स्तरावर नाचक्की केली. हे देशप्रेम नव्हे, हा एक प्रकारचा देशद्रोह आहे, अशी टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काँग्रेसने आणि त्यांच्या नेत्यांनी देशातील जनतेची माफी मागायला हवी, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या या वृत्तीची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. ते म्हणाले की भारत-अमेरिका कराराला विरोध असेल तर त्या विरोधाची कारणे सांगत सैद्धांतिक मांडणी काँग्रेसने केली पाहिजे. तसे न करता, भारत मंडपममध्ये गोंधळ घालून, देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून विदेशी पाहुण्यांसमोर आपल्याच देशाची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसने केला. परदेशात जाऊन भारताविषयी अपप्रचार करणारे राहुल गांधी यांच्यासारखे नेते असल्यानंतर त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांकडून अपेक्षा तरी काय करणार असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.


शिवसेनेचे काँग्रेस विरोधात आंदोलन


शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे काँग्रेस आणि राहुल गांधी विरोधात जोरदार आंदोलन केले. राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात माजी महापौर दत्ता दळवी, माजी नगरसेवक कमलेश राय, शिवसेना सचिव चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार, माजी नगरसेवक राजू पेडणेकर, दिलीप नाईक, विभागप्रमुख गणेश सानप, निलम पवार यांच्यासह महिला आघाडी, युवती सेना आणि मोठ्या संख्येने शाखा प्रमुख शिवसैनिक सहभागी झाले होते. काँग्रेस देशद्रोही आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी यांनी केली.

Comments
Add Comment

Shatrughan Sinha: खामोश शब्द वापराल तर..., मुंबई उच्च न्यायालयाने घातली बंदी

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाकडून दिग्गज अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी; 'पॅक्स सिलिका' गटात भारत सामील

दिल्ली: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि सेमीकंडक्टरच्या युगात भारताने जागतिक स्तरावर एक मोठी आघाडी मारली आहे.

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर

महावीर नगर ,पोयसर जिमखाना परिसर अतिक्रमण मुक्त

वाढीव बांधकामे आणि अनधिकृत स्टॉल्स जमीनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बोरीवली आणि कांदिवली येथील अनधिकृत

महापौर थेट धडकल्या राजावाडी रुग्णालयात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाची मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी शनिवारी २१