Voter List SIR Maharahstra: राज्यात मतदार यादीच्या विशेष पडताळणी प्रक्रियेला सुरुवात

दिल्ली: एप्रिल २०२६ पासून मतदार यादीच्या विशेष पडताळणी प्रक्रियेला (SIR) सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेशी संबंधित तयारीचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले.


महाराष्ट्रासोबत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादर आणि नगर हवेली, दमण- दीव, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, दिल्ली, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा, तेलंगणा आणि उत्तराखंड या २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवली जाणार आहे.


या पत्रात म्हटले की, निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी २४ जून रोजी संपूर्ण देशात एसआयआर राबवले जाईल असा आदेश दिला होता. दरम्यान बिहारनंतर देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २८ ऑक्टोबर २०२५ पासून ही प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत मतदार यादी अद्ययावत केली जात आहे. नवीन मतदारांची नावे जोडली जात आहेत. तसेच नावे वगळली जात आहेत आणि मतदार यादीतील चुका सुधारल्या जात आहेत.

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार