कंत्राटदार नियुक्त कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी करा; भाजपच्या नगरसेविका सातम यांची महापौर,आयुक्तांकडे मागणी

बांग्लादेशींचा शोध महापालिकेच्या प्रकल्प कामांपासून


मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून बांग्लादेशी मुस्लिमांविरोधातील मोहिम तीव्र करण्यात आली आहे. आता भाजपने आपला मोर्चा महापालिकेच्या कामांमधील कंत्राटदार नियुक्त कामगारांकडे वळवला. भाजपच्या गोरेगाव येथील नगरसेविका प्रिती सातम यांनी,मुंबई महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणसह विविध नागरी सेवा आणि पायाभूत प्रकल्प कामातील कामगारांची ओळख पटवण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घरापासून आता भाजपने बांग्लादेशींचा शोध घेण्याचा प्रयत्न सरु केला आहे.


मुंबई महापालिकेच्या विविध नागरी सेवा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये जी कंत्राट कामे देण्यात आली आहेत. त्या कामांमध्ये कंत्राटदार नियुक्त कामगार हा बांगलादेशी मुस्लिम तर नाही ना? हे शोधून काढण्यासाठी प्रत्येक कंत्राटदाराने नियुक्त केलेल्या कामगाराची ओळख पटवण्याचा दृष्टिकोनातून त्या कामगारांच्या कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे.


त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रस्त्याच्या कंत्राटदारांकडे काम करीत असलेल्या सर्व कामगारांची ओळख व तपासणी करण्यात यावी. यात पश्चिम बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद, दिनजापूर उत्तर दक्षिण या तिन जिल्ह्यामधून वितरीत केलेल्या आधार कार्ड धारक कामगारांची सखोल चौकशी करण्यात यावी. आणि ते बांगलादेशी मुस्लीम आहेत की नाही याची चाचपणी तथा पडताळणी करावी अशी त्यांनी निवेदनाद्वारे महापौर आणि आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.


अशाप्रकारच्या मोहिमेमुळे महापालिकेच्या प्रकल्प कामांमधील कामगार हे कुठल्या राज्यातून आलेले आहेत? याची माहिती विभागीय स्तरावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनाही करून देणे शक्य होईल. तरी आपण या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाला आणि पर्यायाने पोलिस प्रशासनाला निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे.


याबाबत माध्यमांशी बोलतांना प्रिती सातम यांनी माझ्या प्रभाग क्रमांक ५२ मधील साई मार्ग रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे. या रस्ते कामामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कामगारांकडून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांशी गैरवर्तन केले जात असल्याच्या तक्रारी मला प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने,मी या रस्त्याच्या कामाची पाहणी करताना, संबंधित कंत्राटदाराला अशा नियुक्त कामगारांची नावे आणि त्यांचे कागदपत्रे मागण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. याच रस्ते कामात एक सलीम नावाचा कामगार होता. आणि तीच व्यक्ती महिलांशी गैरवर्तन करत होती, असे माझ्या निदर्शनास आले. या घटनेकडे पाहिल्यानंतर ही समस्या केवळ गोरेगाव पूर्व गोकुळधाम मधील साई मार्ग रस्त्याच्या कंत्राट कामापुरती मर्यादित नसून संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारे रस्ते कंत्राट आणि विविध नागरी सेवा तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये कंत्राटदार नियुक्त कामगारांच्या बाबतीत आहे, असे मला स्पष्ट जाणवले. त्या अनुषंगाने महापौर आणि आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. या निवेदनाद्वारे मुंबईतील महापालिकेच्या विविध कंत्राट कामांमध्ये मालदा, मुर्शिदाबाद, दिनजापूर उत्तर -दक्षिण या तिन जिल्ह्यातील बांगलादेशी मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या बांगलादेशी मुस्लिम कामगारांच्या शोध घेणे, त्यांना हुडकून काढणे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असल्याने कंत्राट नियुक्त कामगारांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांची ओळख पटवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

BMC APP : रस्त्यांवर खड्डे दिवसात का? करा माय बीएमसी मार्ग ऍपवर तक्रार

Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’

BMC : घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे 'अ‍ॅप' विकसित करा; महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला बचत गटातील सदस्यांना हक्काचा रोजगार

Industrial and commercial water usage : तरण तलाव, बांधकामांच्या ठिकाणच्या जलजोडण्या करणार खंडित

औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात मुंबई: पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १०

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी