T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन खेळाडूंना रिकी पॉन्टिंग कडून घरचा आहेर

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या फेरीतच बाहेर पडल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. ग्लेन मॅकग्रापासून रिकी पॉन्टिंगपर्यंत सर्वांनी कांगारूंच्या कामगिरीवर टीका केली आहे. मॅकग्राने तर ऑस्ट्रेलियाने आपली चमक गमावली आहे असे म्हटले आहे, तर आयसीसी रिव्ह्यू कार्यक्रमात संघाच्या कामगिरीचा आढावा घेताना पॉन्टिंगने ऑस्ट्रेलिया संघाच्या भविष्याबद्दलही आपले विचार मांडले.


ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक स्पर्धेबद्दल बोलताना पॉन्टिंग म्हणाला, "ही खरोखरच वाईट स्पर्धा होती, असं मी म्हणेन." तसेच रिकीने जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना झालेल्या दुखापती आणि सुरुवातीच्या काळात टिम डेव्हिडची अनुपस्थिती ही मोठी समस्या असल्याचे सांगितले. पुढे श्रीलंकेचे कौतुक करताना रिकी म्हणाला की, "घरच्या मैदानावर श्रीलंकेला हरवणे कठीण होते आणि त्यांचा धावांचा पाठलाग आश्चर्यकारक होता आणि त्यांना थांबवणे सोपे नव्हते. पण ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत अशा चुका करू शकत नाही."


पॉन्टिंग असेही म्हणाला की, माजी क्रिकेटपटू व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सध्याच्या खेळाडूंवर कधीही नकारात्मक टीका करत नाहीत. पण त्यांना संघाने चांगली कामगिरी करावी असे वाटते, जे यावेळी झाले नाही. पण ऑस्ट्रेलियन संघ टी-२० विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत नाही ही कल्पना त्यांनी फेटाळून लावली. "अ‍ॅशेसनंतर लगेच कामगिरी करण्यासाठी क्रिकेटपटूंवर दबाव असतो." काही क्रिकेटपटू बीबीएलमध्ये खेळायला गेले, काहींनी विश्रांती घेतली आणि विश्वचषकाची तयारी सुरू ठेवली. आणि विश्वचषक जिंकणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

Comments
Add Comment

R Ashwin : 'भारतीय संघाला हरवणे कठीण'; रविचंद्रन अश्विनने केले सूर्या ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक

भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या गट टप्प्यात अपराजित राहून सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ सध्या

अफगाणिस्तानचा कॅनडाविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय

चेन्नई : इब्राहिम झद्रानच्या वादळी फलंदाजीनंतर मोहम्मद नबीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचेही उडवली दाणादाण

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचेही दाणादाण उडवली.

सलग तीन शून्यांनंतर गावस्कर यांचा अभिषेकला सल्ला

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला

वेस्ट इंडिजची विजयी घोडदौड कायम, इटलीवर विजय

कोलकाता : आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत वेस्ट इंडिजने आपला दबदबा कायम राखत इटलीचा ४२ धावांनी पराभव केला.

T20 World Cup 2026: जाणून घ्या भारताच्या सुपर ८ सामन्यांचे वेळापत्रक; कोणत्या संघासोबत कधी होणार मुकाबला

मुंबई: आयसीसीच्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. सलग चार विजयांसह, भारताने सुपर ८ मध्ये