एलबीएस मार्ग आणि शीव-कुर्ला रेल्वे मार्गावरील पूरपरिस्थितीला आता ब्रेक

मुंबई: भरतीच्या वेळी तसेच विहार आणि पवई तलावामधील ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग तसेच शीव आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर दरवर्षी पाणी भरते. परंतु येत्या दोन वर्षांमध्ये ही समस्या आता कायमचीच दूर होणार असून या पावसाळी पाण्यामुळे विस्कळीत होणारी रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूकीच्या समस्येतूनच कायमचाच दिलासा मिळणार आहे. कारण या समस्येचे निवारण करण्यासाठी आता महापालिकेच्यावतीने मिठीनदी विकास प्रकल्पांतर्गत सीएसटी पूल ते माहिम कॉजवे व वाकोला नदी सहीत भरती प्रवण क्षेत्रात पंपिंग स्टेशन तसेच इतर कामे हाती घेऊन याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.


मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या मिठी नदी प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात करण्यात आले असून त्यातील टप्पा एक अंतर्गत मिठी नदीचे १६ ते ६० मीटरपर्यंत रुंदीकरण व गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर टप्पा दोन अंतर्गत चितळे समिती, केंद्रीय जल विद्युत अनुसंधान संस्था आणि आय टआ टी मुंबई यांनी सादर केलेल्या अहवाल तथा शिफारशीनुसार मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण यांनी मिठी नदी विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार टप्पा दोनअंतर्गत अतिरिक्त रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे ही कामे अंतर्भूत करण्यात आली आहे. त्यानुसार टप्पा दोन अंतर्गत मिठी नदीचे २० ते १०० मीटरपर्यंत रुंदी करण्याचे काम करण्यात आले आहे.


त्यात आता मिठी नदीच्या टप्पा तीन हे काम भरती प्रवण क्षेत्रामध्ये असल्यामुळे मिठी नदीमध्ये विसर्गित होणाऱ्या पाण्याला इंन्टसेप्टरद्वारे अडवून ते पूर नियंत्रणासोबतच प्रदुषण नियंत्रणाशी संबंधित आहे. मिठी नदीमध्ये विसर्गित होणारी पातमुखे ही उच्च पूर पातळीच्या खाली आहेत. त्यामुळे हा विसर्ग इंटरसेप्टरद्वारे अडवून तो नजिकच्या मलजल प्रक्रिया प्रकल्पाला जोडण्यात यावा अशाप्रकारची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे मिठी नदी विकास व प्रदुषण् नियंत्रण प्रकल्प अंतर्गत सीएसटी पूल ते माहिम कॉजवे व वाकोला नदी सहित भरती प्रवणक्षेत्रात पंपिंग स्टेशनसहित पूर नियंत्रण दरवाजे बांधणे, बिनपावसाळी प्रवाह इंटरसेप्टर बांधून वळवणे, मलजल वाहिन्या टाकणे आदींची कामे हाती घेण्यासाठी निविदा मागवली


या अंतर्गत मिठी नदी व वाकोला नदीत एकूण २५ पातमुखांद्वारे होणारे सांडपाणी अडवून ते मिठी नदीच्या किनाऱ्यालगत नियोजित ८३४३ मीटर लांब एवढ्या मलवाहिन्यांद्वारे मुख्य मलवाहिनी वळवणे तसेच मिठी नदीचे उर्वरीत ३००मीटर लांबीचे रुंदीकरण व खोलीकरण, ४७२० मीटर लांबीची संरखक भिंत, ६४२१ लांबीचे सेवा रस्ते व १८ पातमुखांवर पंपिंग स्टेशनची कामे करण्यात येत आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये अदानी अशोका अक्षया ही संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली असून या कंपनीला विविध करांसह २७५० कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे.

Comments
Add Comment

Heavy Rainfall Warning : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून

Mumbai News : मस्जिद बंदर येथे म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला; ६ जणांची सुटका, २ जखमी

मुंबई: मुंबईतून एक मोठी दुर्घटना टळल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी दुपारी मुंबईतील अत्यंत दाट वस्तीच्या आणि

Devendra Fadnavis : मी राज्यात समाधानी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य; संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम मुंबई :

Maharashtra News : राज्यातील निम्म्याहून अधिक धरणे भरली

५३.३८ टक्के पाणीसाठा; मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम मुंबई : राज्यातील विविध

Mumbai Environment : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प कार्यान्वित

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड खाडीमध्ये जागतिक

MUMBAI-PUNE WATER LEVEL : मुंबई आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली; दोन्ही शहरांच्या धरणांमध्ये जोरदार जलसाठा जमा!

मुंबई: महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबई व पुणेकरांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावर्षी