कानिफनाथ यात्रेत वादाची ठिणगी; मुस्लिम व्यावसायिकांची दुकाने करणार बंद

अहिल्यानगर : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि भटक्यांची पंढरी म्हणेजच श्री क्षेत्र मढीची कानिफनाथ यात्रा. याच यात्रेवरून आता हिंदू- मुस्लिम ही वादाची ठिणगी पेटली आहे. देवाची यात्रा म्हटल्यावर बरीच दुकाने या यात्रेत लावली जातात. लहानमुलांच्या खेळण्यापासून ते कपड्यांपर्यंतची दुकाने या यात्रेत लावलेली असतात. परंतु मढी ग्रामपंचायत मुस्लिमांना दुकाने लावू देणार नाही. या आपल्या जुन्या भूमिकेवर ग्रामपंचायत ठाम राहिली आहे. यात्रेपूर्वीच ही भूमिका जाहीर केल्याने यात्रेपूर्वीच हा वाद रंगला आहे.



नेमकं घडलं काय ?


दरवर्षीच रंगपंचमीच्या मुहूर्तावर मढी येथे मोठी कानिफनाथ महाराजांची मोठी यात्रा भरते. मात्र गेल्या काही वर्षापासून या वादाला हिंदू मुस्लिम या भेदभावाची कीड लागली आहे.त्याचवेळी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यासायिकांसोबत यात्रेत व्यवसाय करण्यास मनाई करणारा निर्णय मंजूर केला होता. यात्रेत मुसलमांना दुकान लावू देणारच नाही असा निर्धार हिंदू गावकऱ्यांनी केला आहे. या निर्णयामुळे इतका मोठा गदारोळ झाला की वाद थेट न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. न्यायालयाने अद्याप यावर कोणताही अंतिम निकाल दिलेला नसला तरी गावकरी आपल्या मतावर ठाम असल्याची माहिती आहे.



सरपंचाची आक्रमक भूमिका


सरपंचानी स्पष्ट केले आहे की, ग्रामपंचायत आपल्या निर्णयावर ठाम असून यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत जागा दिली जाणार नाही.


कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाला अनेक भाविक हे राज्यभरातून येत असतात. भली मोठी यात्रा आणि त्यात होणारा हा हिंदू मुस्लिम वाद यामुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सतर्क झाले आहे

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी