भिगवण प्रकरणाला कलाटणी; मुलीने फिरवली बाजी निवडली पोलिसांची गाडी

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका मधील भिगवण येते घडलेल्या अपहरण प्रकरणाचे दिवसेंदिवस नवीन पैलू उलघडत जात आहेत या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले आहे.



तर झालं असं


मागच्या आठवड्यात भिगवण येथे जे घडल ते संपूर्ण राज्याला हादरवणारे होत. आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत मुलीला पळवून नेले, आणि काही दिवसांनी त्याच मुलीने आपण स्वखुशीने पळून आलोय असा व्हिडीओ शेअर केला, ज्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. हा खटला न्यायालयात मांडण्यात आला.


जबाब नोंदवून झाल्यानंतर मुलगी न्यायालयाच्या आवारातून बाहेर आली. समोर तिची आई मुलीच्या भेटीसाठी आस लावून बसली होती. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या... गहिवरलेल्या मनाने 'माझी मुलगी मला परत द्या' अशी गयावया करत होती. मात्र मुलीला आईच्या मायेचा पाझर फुटला नाही. आईकडे न पाहता मुलीने पोलिसांच्या गाडीकडे धाव घेतली.



आईच म्हणणं काय आहे?


एकीकडे तरुणी स्वतःच्या इच्छेने गेल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे तिच्या आईने माझी मुलगी पळून गेलेली नाही, तिला जबरदस्तीने नेण्यात आले, असा आरोप केला आहे. दोघांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तरुणी आणि तिच्या आईच्या विधानांमध्ये प्रचंड तफावत असल्याने या प्रकरणाचा नेमका छडा लागेपर्यंत तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


दरम्यान न्यायालयासमोर दंड प्रक्रिया संहिता कलम १६४ अंतर्गत नोंदवलेल्या जबाबात तरुणीने आईकडे जाण्यास नकार दिला आहे. सध्या तिला सुधारगृहात ठेवून समुपदेशन केले जाणार आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील चौकशीतून नेमके सत्य काय समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या