Shiv Jayanti 2026 : मुंबईत शिवजन्मोत्सवाचा शाही थाट! राज्यपाल आणि महापौरांच्या उपस्थितीत शिवरायांना अभिवादन

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज मुंबईत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित मुख्य सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत आणि मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा केला. शिवाजी पार्क येथील अभिवादनानंतर क्रीडा भवन येथे एक छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रितू राजेश तावडे होत्या. महापालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या चमूने शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासावर आधारित गौरवगीते सादर केली. या सादरीकरणाने प्रभावित होऊन राज्यपाल महोदयांनी अकादमीच्या चमूला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.



गेट वे ऑफ इंडिया आणि भायखळा येथेही मानवंदना


मुंबईच्या विविध ऐतिहासिक स्थळांवरही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. गेट वे ऑफ इंडिया मधील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पहाटे ७ ते ९ या वेळेत सनई-चौघड्यांच्या सुरांनी परिसर दुमदुमला होता. श्री शिव छत्रपती मंडळाच्या सुहासिनींनी महाराजांची भावपूर्ण आरती केली. भायखळा मधील 'बाल शिवाजी'च्या पुतळ्यालाही मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक उपस्थित होते. पालिकेच्या मुख्य सभागृहातील महाराजांच्या अर्धपुतळ्यास महापौरांनी पुष्पहार अर्पण करून प्रशासकीय स्तरावर शिवजयंती साजरी केली.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र