Pune Crime: पुणे पोलिसांच्या सर्च मोहिमेला मोठे यश; ११ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी बुधवार १८ फेब्रुवारीच्या रात्री विशेष सर्च मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या अवैध हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन सुरू केले होते. याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या महिला बांगलादेशी नागरिक असून त्या बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


तपासादरम्यान त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी सर्व महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


गेल्या काही महिन्यांपासून बुधवार पेठेत सुरू असलेल्या अवैध हालचालींवर पोलीस लक्ष ठेऊन होते. अखेर १८ फेब्रुवारीच्या सर्च ऑपरेशनमध्ये त्यांच्या हाती मोठे यश लागले आहे.


या भागात बांगलादेशी महिला वेश्या व्यवसाय करत असतात अशी माहिती मिळाली होती. त्याआधारे बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातून या ११ बांगलादेशी महिलांवर कारवाई झाल्याचे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावळे यांनी सांगितले. आम्ही एकूण २२ महिलांवर कारवाई केली त्यातील ११ महिला या बांगलादेशी असल्याचे उघडकीस आले आहे. या महिला काही महिन्यांपासून शहरात बेकायदेशीरपणे रहात होत्या हे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.


पुण्यातील बांग्लादेशी नागरिकांवरील ही कारवाई झाल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. खडक पोलीसांनी ११ बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. सातत्याने बांग्लादेशी महिला सापडत असल्याने आज स्वतः पोलीस आयुक्त फरसखाना पोलीस ठाण्यात दाखल झाले. अमितेश कुमार यांनी स्वतः या कारवाईचा आढावा घेतला.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू