Kalyan News: कल्याण स्थानकावर महिला प्रवाशासोबत घडला भयंकर प्रकार

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकावर संतापजनक घटना घडली आहे. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. यादरम्यान भयानक गर्दी पाहायला मिळते. तसेच प्रवाशांमध्ये बाचाबाची आणि भांडण देखील होताना पाहायला मिळतात. अशातच आता महिला प्रवाशांमधील हिंसक प्रकार पाहायला मिळाला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी डब्यात चढण्यावरून झालेल्या वादात एका महिलेला दुसऱ्या महिलेने चक्क घेऊन तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.



नेमकं घडलं काय?



कल्याण पूर्वेकडील मलंगगड रोड परिसरात राहणाऱ्या प्रियंका थोरात या अंधेरी येथे नोकरीला आहेत. मंगळवारी सकाळी त्या कल्याण स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होत्या. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने काही महिला उतरत होत्या तर काही चढत होत्या. यादरम्यान डब्यातून उतरणाऱ्या एका अज्ञात महिलेने प्रियंका यांना चढण्यास मज्जाव केला. प्रियंका यांनी डब्यात शिरण्याचा प्रयत्न केला असता, त्या अज्ञात महिलेने त्यांना बाहेर ढकलले आणि झटापटीत प्रियंका यांच्या दंडाला जोरात चावा घेतला. एवढ्यावरच न थांबता तिने प्रियंका यांचे बोट पिरगळले, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.


दुखापत होऊनही कामावर उशीर होऊ नये म्हणून प्रियंका यांनी त्याच लोकलने प्रवास केला. मात्र, संध्याकाळी डॉक्टरांकडे तपासणी केली असता बोटाला गंभीर इजा झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात (GRP) धाव घेऊन तक्रार नोंदवली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फलाट क्रमांक ६ वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपी महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)