विवेक भीमनवार यांनी घेतली एमपीएससीच्या अध्यक्षपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, बुधवारी त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवन येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली.


या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या या घटनादत्त स्वायत्त संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता भीमनवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.


सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भीमनवार यांची ही नियुक्ती पदभार स्वीकारल्यापासून सहा वर्षांसाठी किंवा त्यांच्या वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत) असेल. दरम्यान, भीमनवार यांनी कार्यभार स्वीकारेपर्यंत आयोगाचे सदस्य डॉ. अभय वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.


राज्य सरकारच्या विविध संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याचे मोठे आव्हान आता नवनियुक्त अध्यक्षांसमोर असणार आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा फायदा आयोगाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



कोण आहेत विवेक भीमनवार?


 

विवेक भीमनवार हे २००९ च्या बॅचचे 'महाराष्ट्र कॅडर'चे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी एलएलबी आणि एमएससी या पदव्या संपादन केल्या आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते राज्याचे परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते. परिवहन आयुक्त असताना त्यांनी मुंबई महानगर प्रदेशातील बेकायदेशीर 'बाईक टॅक्सी' सेवांविरुद्ध कठोर मोहीम उघडली होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांची प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.

Comments
Add Comment

Nashik Accident : दिंडोरी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू

Nashik Accident : भरधाव कार थेट विहिरीत पडून ९ जणांचा हृदयद्रावक अंत

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री

पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला, ६५ जण जखमी

पुणे : राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर मधमाश्यांनी हल्ला केला.

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर

संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ

Malegaon News : मालेगावच्या महासभेत सत्ताधारी एकमेकांशी भिडले

मालेगाव : मतदार याद्यांचे पुनर्निरिक्षणाच्या मुद्द्यावरून मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी एमआयएम आणि