विवेक भीमनवार यांनी घेतली एमपीएससीच्या अध्यक्षपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, बुधवारी त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवन येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली.


या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या या घटनादत्त स्वायत्त संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता भीमनवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.


सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भीमनवार यांची ही नियुक्ती पदभार स्वीकारल्यापासून सहा वर्षांसाठी किंवा त्यांच्या वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत) असेल. दरम्यान, भीमनवार यांनी कार्यभार स्वीकारेपर्यंत आयोगाचे सदस्य डॉ. अभय वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.


राज्य सरकारच्या विविध संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याचे मोठे आव्हान आता नवनियुक्त अध्यक्षांसमोर असणार आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा फायदा आयोगाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



कोण आहेत विवेक भीमनवार?


 

विवेक भीमनवार हे २००९ च्या बॅचचे 'महाराष्ट्र कॅडर'चे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी एलएलबी आणि एमएससी या पदव्या संपादन केल्या आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते राज्याचे परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते. परिवहन आयुक्त असताना त्यांनी मुंबई महानगर प्रदेशातील बेकायदेशीर 'बाईक टॅक्सी' सेवांविरुद्ध कठोर मोहीम उघडली होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांची प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू