Grampanchayat Election: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजणार; 'या' तारखांना निवडणूक होण्याची शक्यता

मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नवनवीन स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने अधिकृत प्रभाग रचना (वॉर्ड) कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेनुसार, येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.


ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.



प्रभाग रचनेचे महत्त्वाचे टप्पे


 

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. 'गुगल अर्थ'च्या साहाय्याने गावांचे नकाशे अंतिम करण्याची जबाबदारी तहसीलदारांवर असेल.


२७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाहणी करतील आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करतील. २३ मार्च २०२६ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावाला अंतिम मान्यता देईल. त्यानंतर ७ एप्रिल २०२६ पर्यंत ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल.


प्रभाग रचनेबाबत नागरिकांना आपले मत मांडण्यासाठी प्रशासनाने पुरेसा वेळ दिला आहे. ७ एप्रिल रोजी प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी नागरिकांना आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येतील. तर, २१ एप्रिल २०२६ पर्यंत प्राप्त झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून प्रभाग रचना २८ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम करतील.


४ मे २०२६ रोजी जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असल्याने, ग्रामीण भागात आतापासूनच राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या