राष्ट्रपतींनी केली विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू ची पाहणी

नवी दिल्‍ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूची पाहणी केली. ‘इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू, २०२६’ मध्ये ७० हून अधिक देशांची नौदले सहभागी झाली आहेत.


यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू हा सागरी परंपरांबद्दल विविध राष्ट्रांमधील एकता, विश्वास आणि आदर प्रतिबिंबित करतो. वेगवेगळे ध्वज असलेली जहाजे आणि विविध देशांचे खलाशी एकतेची भावना प्रदर्शित करतात. एकजुटीची ही भावना, 'युनायटेड थ्रू ओशन्स' या पुनरावलोकनाच्या संकल्पनेत मांडण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या सामूहिक नौदल सामर्थ्याची वचनबद्धता आणि निर्धार सर्व आव्हानांवर मात करू शकतो, हा जागतिक समुदायासाठी एक सकारात्मक संदेश आहे, असे त्या म्हणाल्या.


सागरी क्षेत्रासह आंतरराष्ट्रीय संबंधांकडे पाहण्याचा भारताचा दृष्टीकोन 'वसुधैव कुटुंबकम' किंवा 'जग एक कुटुंब आहे' या मूल्यांवर आधारित आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. हा दृष्टीकोन असा व्यावहारिक विचार मांडतो की, भागीदारीतून जागतिक सुरक्षा आणि विकास, शाश्वतता आणि स्थैर्य निर्माण होते. भागीदारीची ही भावना शाश्वत जागतिक व्यवस्थेचा पाया आहे. भारताचा असा विश्वास आहे की एक मजबूत सागरी व्यवस्था, ही सामूहिक जबाबदारी आणि समविचारी भागीदारांमधील सहकार्यात्मक कृतीवर आधारित आहे. त्या म्हणाल्या की, हा फ्लीट रिव्ह्यू भारताच्या ‘महासागर’ हा दृष्टीकोन देखील पुढे नेत आहे, ज्याचा अर्थ संपूर्ण प्रदेशाची सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती, हा आहे, असे त्या म्हणाल्या.


राष्ट्रपतींनी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या परदेशी नौदलातील अधिकारी आणि खलाशांची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की हे जवान त्यांची सेवा आणि त्यांच्या राष्ट्रांच्या सर्वोत्तम परंपरांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची शिस्त, समर्पण आणि क्षमता हा सामूहिक सागरी सुरक्षेचा पाया आहे. फ्लीट रिव्ह्यूमधील त्यांच्या उपस्थितीमुळे आपले विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले आहेत आणि महासागरातील शांतता, स्थैर्य आणि सहकार्याप्रति आपली सामायिक वचनबद्धता पुन्हा सिद्ध झाली आहे, असे त्या म्हणाल्या.


या फ्लीट रिव्ह्यूमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी सर्व नौदले एकत्रितपणे जागतिक समुदायाचा विकास, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाला चालना देणारा घटक म्हणून महासागरांची भरभराट करण्यात सहाय्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने

Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर