Nitesh Rane : काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक; मंत्री नितेश राणे

केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही


मुंबई : काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. काजू उद्योगाला आर्थिक बळकटी देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीत काजू निर्यात धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र व राज्य शासन यांच्यात समन्वय साधून महाराष्ट्रातून काजूची निर्यात वाढविण्याबाबत धोरणात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश मंत्री श्री. नितेश राणे यांनी यावेळी दिले. काजू प्रक्रिया उद्योग, निर्यातदार व शेतकरी यांना अधिक लाभ मिळावा यासाठी आवश्यक त्या निर्णयांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली.



या बैठकीस महाराष्ट्र काजू प्रक्रिया उद्योग (KCO) असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुरेश बोवलेकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या निर्णयामुळे सिंधुदुर्गसह कोकणातील काजू उद्योगाला चालना मिळून रोजगारनिर्मिती, निर्यातवाढ तसेच स्थानिक आर्थिक विकासाला बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments
Add Comment

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना