मुंबई : देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, या सर्व ३७ जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या ७ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, डॉ. भागवत कराड, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील, डॉ. फौजिया खान आणि धैर्यशील पाटील या नेत्यांचा समावेश आहे.
राज्यातील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी (मविआ) अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. विधानसभेत भाजपकडे १३२, शिवसेनेकडे ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) ४१ असे महायुतीचे भक्कम संख्याबळ आहे. याउलट, उबाठा गटाकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि शरद पवार गटाकडे केवळ १० आमदार आहेत. या आकडेवारीनुसार, महायुती सातपैकी सहा जागा सहज जिंकू शकते. उरलेल्या एका जागेसाठी महाविकास आघाडीला आपल्या तिन्ही घटक पक्षांची मते एकवटून मोठी कसरत करावी लागणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, ...
- अधिसूचना जारी होणे :२६ फेब्रुवारी २०२६ - अर्ज भरण्याची अंतिम मुदत : ५ मार्च २०२६ - अर्जांची छाननी : ६ मार्च २०२६ - अर्ज मागे घेण्याची मुदत : ९ मार्च २०२६ - मतदान व मतमोजणी : १६ मार्च २०२६ (सकाळी ९ ते ४ मतदान; सायंकाळी ५ वाजता मतमोजणी)
शरद पवार पुन्हा रिंगणात?
निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये प्रियांका चतुर्वेदी (उबाठा) आणि रजनी पाटील (काँग्रेस) यांच्या पुनर्निवडीवर टांगती तलवार आहे, कारण त्यांच्या पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नाही. अशा स्थितीत ६० वर्षांहून अधिक काळाचा संसदीय अनुभव असलेले शरद पवार यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मविआतील मित्रपक्ष आपल्या जागांचा त्याग करून पवार यांच्या नावावर एकमत करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर मविआत समन्वयाचा अभाव राहिला, तर महायुती या निवडणुकीतही 'क्लीन स्वीप' देईल, असे बोलले जात आहे. कुठे किती जागांसाठी निवडणूक
महाराष्ट्रासह इतर ९ राज्यांमध्येही राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये तामिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), बिहार (५), ओदिशा (४), आसाम (३), हरियाणा (२), छत्तीसगड (२), तेलंगणा (२) आणि हिमाचल प्रदेश (१) या राज्यांचा समावेश आहे.







