डोंबिवलीत बंद फ्लॅटवर चोरट्यांची नजर; लाखो रुपयांचा ऐवज गायब

डोंबिवली : शहरात अलीकडे घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. भरवस्तीतील बंद घरांवर लक्ष ठेवून चोरट्यांकडून हात साफ केला जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारची एक गंभीर घटना देसलेपाडा परिसरात उघडकीस आली असून, लग्नासाठी गावी गेलेल्या कुटुंबाच्या फ्लॅटमध्ये मोठी चोरी झाल्याचे समोर आले आहे.


देसलेपाडा येथील आर.पी. रेसीडेन्सीमध्ये राहणारे अशिष रामधनी यादव हे आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील मूळ गावी विवाह सोहळ्यासाठी गेले होते. घर सुरक्षित राहावे यासाठी त्यांनी फ्लॅटची चावी आपल्या बहिणीकडे सोपवली होती. ९ फेब्रुवारी रोजी घरात कीटकनाशक फवारणीचे काम पूर्ण करण्यात आले होते आणि त्यानंतर घर व्यवस्थित बंद करण्यात आले होते.


दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजी वॉटर फिल्टरच्या दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ येणार असल्याने यादव यांच्या बहिणी मायादेवी आणि त्यांचे पती दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास फ्लॅटवर पोहोचले. मात्र तेथे पोहोचताच सेफ्टी डोअर तसेच मुख्य दरवाजाची कडी तुटलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश केल्यावर दोन्ही शयनकक्षांतील कपाटे उघडी आढळली. लॉकर फोडण्यात आले होते आणि घरातील साहित्य विस्कळीत अवस्थेत पडलेले होते.


या प्रकाराची माहिती तातडीने अशिष यादव यांना देण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, कपाटात ठेवलेले सुमारे ४० तोळे सोन्याचे दागिने तसेच अंदाजे ५० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात अस्वस्थता निर्माण झाली आहे.



गुन्हा दाखल; सीसीटीव्ही तपास सुरू


घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अज्ञात व्यक्तींविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून संशयितांचा माग काढण्यासाठी पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


लग्नसराई आणि सुट्ट्यांच्या काळात अनेक कुटुंबे बाहेरगावी जात असल्याने बंद घरांवर चोरट्यांची नजर असते. त्यामुळे नागरिकांनी घर सुरक्षिततेसाठी अतिरिक्त खबरदारी घ्यावी आणि मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवाव्यात, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न

नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वर्षेच

शासनाने फेटाळला निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मधील अधिकारी व

संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ

Malegaon News : मालेगावच्या महासभेत सत्ताधारी एकमेकांशी भिडले

मालेगाव : मतदार याद्यांचे पुनर्निरिक्षणाच्या मुद्द्यावरून मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी एमआयएम आणि

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते