२०३० पर्यंत राज्यात ५० टक्के हरित ऊर्जेचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; देशातील पहिल्या 'क्लायमेट वीक'चे मुंबईत उद्घाटन

मुंबई : "राज्यात सध्या अक्षय ऊर्जेची क्षमता झपाट्याने वाढवली जात असून, २०३० पर्यंत एकूण वीज निर्मितीत हरित ऊर्जेचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यासाठी ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहतूक आणि शाश्वत पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे", असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.


देशातील पहिल्या 'मुंबई क्लायमेट वीक'चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर येथे झाले. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि जागतिक पर्यावरणातील मान्यवर उपस्थित होते. "हवामान कृतीकडे आम्ही केवळ नियमांचे पालन म्हणून पाहत नाही, तर ती गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीची एक मोठी संधी मानतो. जे राज्य हे बदल वेगाने स्वीकारेल, तेच जागतिक भांडवल आणि कौशल्य आकर्षित करू शकेल," असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.


"हवामान बदलाचे संकट हे केवळ पर्यावरणीय आव्हान नसून, भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची ती एक 'किल्ली' आहे. या बदलाचा फटका मुंबईसारख्या किनारी शहरांना आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. त्यामुळे हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे जागतिक नेतृत्व करण्यास महाराष्ट्र आता पूर्णपणे सज्ज आहे," अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.



महाराष्ट्राला अतिरिक्त १ लाख सौर पंप


'पीएम कुसुम' योजनेत महाराष्ट्राने देशात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्याचे कौतुक केले. या यशाची दखल घेत त्यांनी महाराष्ट्रासाठी आणखी १ लाख सौर कृषी पंप मंजूर करण्याची घोषणा यावेळी केली. "भारत आर्थिक विकास आणि उत्सर्जन कपात यांची सांगड घालून जगासमोर आदर्श निर्माण करत आहे," असे जोशी म्हणाले.



जागतिक करारांवर स्वाक्षरी


या परिषदेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दोन महत्त्वाचे सामंजस्य करार केले. संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम आणि 'सी-४० सिटीज' या जागतिक संस्थांच्या सोबतीने मुंबईचा 'हवामान अनुकूल आराखडा' तयार केला जाणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Bomb Threat : मुंबईत खळबळ! महापौर कार्यालय, BMC मुख्यालय आणि मेट्रो स्थानकांना बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मुंबई महापौर कार्यालय,

Mumbai Local Train : मुंबई लोकलमध्ये वडाळाजवळ पुरुषाकडून महिलेला बेदम मारहाण; बेल्ट काढून धमकी, सहप्रवाशी ठरले मूकदर्शक!

मुंबई : मुंबईकरांची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या 'लोकल ट्रेन' (Mumbai Local Train) मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा

Birthday Celebration Firing : 'बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा'; रस्त्यात सेलिब्रेशन अन् बेबी एअरगनमधून गोळीबार महागात पडली

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बेबी एअरगनमधून गोळीबार;10 जणांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी ताब्यात बोरिवली :

Publications Banned : अतिरेकी विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्या ११४ प्रकाशनांवर बंदी

- राज्य सरकारचा निर्णय; 'काश्मीर किफाह – रेझिलियन्स अँड करेज', 'नवाई गझवा-ए-हिंद'चा समावेश मुंबई : हिंसक अतिरेकी

Mumbai News : गृहनिर्माण सोसायट्यांनी पदपथांवरील रॅम्प, अतिक्रमणे तातडीने हटवावेत; अन्यथा कठोर कारवाई

महापालिका आयुक्तांचे इशारावजा आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ हे नागरिकांना सुरक्षितपणे आणि

Mumbai Mandai News : मुंबईतील मंड्यांच्या पुनर्विकासासाठी धोरणात्मक घेणार निर्णय

स्थायी समितीच्यावतीने होणार विशेष बैठक मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक मंडईंचा पुनर्विकास रखडलेला असून